AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IndvsAus : भारत विजयापासून 6 पावलं दूर

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडिलेड कसोटीत भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाची परिस्थिती चार बाद 104 अशी होती. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आणखी 219 धावांची गरज आहे. शॉर्न मार्श (31) आणि ट्रेविस हेड (11) सध्या खेळपट्टीवर आहेत. भारताला पहिल्या डावात 15 धावांची आघाडी मिळाली होती आणि दुसर्या डावात 307 धांवांची मजल मारली. […]

IndvsAus : भारत विजयापासून 6 पावलं दूर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडिलेड कसोटीत भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाची परिस्थिती चार बाद 104 अशी होती. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आणखी 219 धावांची गरज आहे. शॉर्न मार्श (31) आणि ट्रेविस हेड (11) सध्या खेळपट्टीवर आहेत.

भारताला पहिल्या डावात 15 धावांची आघाडी मिळाली होती आणि दुसर्या डावात 307 धांवांची मजल मारली. 322 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला अॅरॉन फिंच आणि हॅरिस यांच्या रुपाने सुरूवातीलाच दोन धक्के लागले. त्यानंतर ख्वाजा आणि हँड्सकॉम्ब यांना माघारी धाडण्यातही भारतीय गोलंदाजांना यश आलं. अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

खेळपट्टीची स्थिती पाहता ऑस्ट्रेलियन फलंदाजांना उद्या 219 धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. वेगवान गोलंदाजांचा प्रभावी मारा आणि अश्विनच्या फिरकीचा सामना करणं आस्ट्रेलियन फलंदाजांना जिकिरीचं होऊन बसलंय. त्यामुळे उभय संघ शेवटच्या दिवशी विजयासाठी कसरत करताना दिसणार आहेत.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने सलामीची भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. फिंचने 11 धावांसाठी 35 तर मार्कस हॅरिसने 26 धावांसाठी 49 चेंडूंचा सामना केला. पण अश्विन आणि शमीने हा प्रयत्न फार काळ टिकू दिला नाही. फिंच आणि हॅरिसला स्वस्तात माघारी धाडण्यात भारताला यश आलं.

अॅडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी, भारताने 3 बाद 151 अशी मजल मारली होती. त्यामुळे भारताची आघाडी पहिल्या डावातील 15 धावांमुळे 166 पर्यंत वाढली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा 40 आणि अजिंक्य रहाणे 1 धावांवर खेळत होते. रहाणेने चौथ्या दिवशी शानदार अर्धशतक साजरं केलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 235 धावांवर गुंडाळल्यामुळे भारताला पहिल्या डावात 15 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. मुरली विजय आणि के एल राहुल यांनी 63 धावांची सलामी दिली. ही जोडी टिकली असं वाटत असतानाच मिचेल स्टार्कने मुरली विजयला हॅण्डस्कोम्बकरवी झेलबाद केलं. मुरली विजयने 18 धावा केल्या.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.