AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय क्रिकेट संघाचा पहिला यष्टीरक्षक मराठमोळा; गरिबीमुळे करावी लागली सुरक्षारक्षकाची नोकरी

त्या काळात क्रिकेट जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर यष्टीरक्षक म्हणून जनार्दन नवले यांच्या नावाचा दबदबा होता. | Janardan Navle

भारतीय क्रिकेट संघाचा पहिला यष्टीरक्षक मराठमोळा; गरिबीमुळे करावी लागली सुरक्षारक्षकाची नोकरी
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Dec 07, 2020 | 9:34 AM
Share

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे पहिले यष्टीरक्षक (Wicket keeper) जनार्दन ज्ञानोबा नवले यांचा आज स्मृतीदिन आहे. काळाच्या ओघात ते क्रीडा रसिकांच्या विस्मरणात गेले असले तरी जनार्दन नवले यांची कहाणी खूपच रंजक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले यष्टीरक्षक होते. एवढेच नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पहिला चेंडू खेळण्याचा विक्रमही जनार्दन नवले यांच्या नावावर आहे. 1932 साली लॉर्डसवर झालेल्या कसोटी सामन्यात ते खेळले होते. (Janardan Navle India’s first Test wicketkeeper who also faced the first ball for them)

जनार्दन नवले यांचा जन्म 7 डिसेंबर 1902 रोजी फुलगाव येथे झाला होता. त्यांचे वडील शेतकरी आणि कापडाचे व्यापारी होते. त्या काळात क्रिकेट जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर यष्टीरक्षक म्हणून जनार्दन नवले यांच्या नावाचा दबदबा होता.

65 सामन्यांत 101 झेल आणि 36 स्टम्पिंग

पाच फूट चार इंच उंची असलेले जनार्दन नवले अत्यंत चपळ क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 65 सामन्यांमध्ये 101 झेल टिपले असून 36 स्टम्पिंग केल्या होत्या. याशिवाय, ते जलदगती गोलंदाजांविरुद्ध समर्थपणे फलंदाजी करत. त्यांनी 19.18 च्या सरासरीने 1917 धावा केल्या होत्या. यामध्ये नऊ अर्धशतकांचा समावेश आहे.

जनार्दन नवले यांनी वयाच्या 15व्या वर्षी चौरंगी स्पर्धेत हिंदूज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघात ते सलामीवीर म्हणून खेळायचे. 17व्या वर्षी जनार्दन नवले यांनी या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात मुस्लिम्स संघाविरुद्ध 74 तर अंतिम सामन्यात पारसी संघाविरुद्ध 96 धावा केल्या होत्या.

पहिल्या कसोटी सामन्यात 25 धावा

जनार्दन नवले यांनी 1932 साली भारतीय संघाच्या पहिल्यावहिल्या कसोटी दौऱ्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात त्यांची निवड झाली. मात्र, इंग्लंड दौऱ्यावर ते फारशी चमक दाखवू शकले नाहीत. या सामन्यात त्यांनी दोन डावांत अनुक्रमे 12 आणि 13 धावा केल्या. या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला होता. तर नंतरच्या कारकीर्दीत 21 कसोटी सामन्यांमध्ये नवले यांनी केवळ एक अर्धशतक केले. मात्र, आपल्या यष्टीरक्षणाने त्यांनी साऱ्यांनाच प्रभावित केले.

उतारवयात जनार्दन नवले यांचे आयुष्य हालाखीत

इंग्लंड दौऱ्यानंतर जनार्दन नवले यांना भारतीय संघात कधीही स्थान मिळाले नाही. त्यामुळे जनार्दन नवले यांनी एका कारखान्यात सुरक्षारक्षकाची नोकरी धरली. मात्र, यामधून फारसे पैसे मिळत नसल्याने जनार्दन नवले यांचे आयुष्य हालाखीत गेले. अनेकांनी त्यांना मुंबई-पुणे महामार्गावर भीक मागतानाही बघितले होते. मात्र, याविषयी अधिकृत माहिती नाही. अखेर 7 सप्टेंबर 1979 रोजी जनार्दन नवले यांचे निधन झाले.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.