AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वचषकातील भारताच्या एक्झिटनंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराची मनं जिंकणारी प्रतिक्रिया

आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये 18 धावांनी विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने भारतीय संघाबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विल्यमसनच्या या प्रतिक्रियेतील खिलाडूवृत्तीने अनेक क्रिकेटरसिकांची मनं जिंकली.

विश्वचषकातील भारताच्या एक्झिटनंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराची मनं जिंकणारी प्रतिक्रिया
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 11, 2019 | 9:24 AM
Share

लंडन: आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये 18 धावांनी विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने भारतीय संघाबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विल्यमसनच्या या प्रतिक्रियेतील खिलाडूवृत्तीने अनेक क्रिकेटरसिकांची मनं जिंकली. विल्यमसन म्हणाला, “विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये सुरुवातीला भारतीय संघ अडचणीत आला होता. असं असतानाही इतर खेळाडूंनी शेवटपर्यंत सामन्यात आपलं आव्हान कायम ठेवलं. यामुळेच भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघ आहे.”

पावसाच्या  व्यत्ययामुळे दोन दिवस चाललेल्या विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 3 षटकात केवळ 5 धावांवर आपले 3 आघाडीचे फलंदाज गमावले होते. त्यापुढे 6 फलंदाज गमावत भारताला केवळ 92 धावा करता आल्या होत्या. मात्र, रवींद्र जाडेजाने (77) आणि महेंद्र सिंह धोनीने (50) अशी 116 धावांची भागीदारी केल्याने सामन्यात भारताचे आव्हान कायम राहिले. अखेर या दोघांच्या विकेट पडल्यानंतर भारताचे आव्हानही संपुष्टात आले.

या सामन्यातील विजयानंतर विल्यमसन म्हणाला, “या खेळपट्टीवर 240-250 चे लक्ष्य चांगले राहिल आणि या धावसंख्येवर आम्ही भारतावर दबाव आणू, असा आम्ही विचार केला होता. आमच्या खेळाडूंनी हे यशस्वीपणे करुन दाखवले. नव्या चेंडूला आमच्या गोलंदाजांनी खेळपट्टीवर आणि हवेत स्विंग करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला जागतिक स्तरावरील फलंदाजांवर दबाव आणायचा होता. खेळपट्टी संथ झाल्यानंतर त्याचा आम्हाला फायदा घ्यायचा आहे, हेही आम्ही ठरवले होते. मात्र, भारत जगातील सर्वोत्कृष्ट संघ का आहे हे त्यांनी दाखवून दिले. धोनी आणि जाडेजाने सामना शेवटपर्यंत नेला. त्यांनी हा सामना जिंकला देखील असता.”

Follow Us
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!