AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वचषकातील भारताच्या एक्झिटनंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराची मनं जिंकणारी प्रतिक्रिया

आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये 18 धावांनी विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने भारतीय संघाबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विल्यमसनच्या या प्रतिक्रियेतील खिलाडूवृत्तीने अनेक क्रिकेटरसिकांची मनं जिंकली.

विश्वचषकातील भारताच्या एक्झिटनंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराची मनं जिंकणारी प्रतिक्रिया
| Updated on: Jul 11, 2019 | 9:24 AM
Share

लंडन: आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये 18 धावांनी विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने भारतीय संघाबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विल्यमसनच्या या प्रतिक्रियेतील खिलाडूवृत्तीने अनेक क्रिकेटरसिकांची मनं जिंकली. विल्यमसन म्हणाला, “विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये सुरुवातीला भारतीय संघ अडचणीत आला होता. असं असतानाही इतर खेळाडूंनी शेवटपर्यंत सामन्यात आपलं आव्हान कायम ठेवलं. यामुळेच भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघ आहे.”

पावसाच्या  व्यत्ययामुळे दोन दिवस चाललेल्या विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 3 षटकात केवळ 5 धावांवर आपले 3 आघाडीचे फलंदाज गमावले होते. त्यापुढे 6 फलंदाज गमावत भारताला केवळ 92 धावा करता आल्या होत्या. मात्र, रवींद्र जाडेजाने (77) आणि महेंद्र सिंह धोनीने (50) अशी 116 धावांची भागीदारी केल्याने सामन्यात भारताचे आव्हान कायम राहिले. अखेर या दोघांच्या विकेट पडल्यानंतर भारताचे आव्हानही संपुष्टात आले.

या सामन्यातील विजयानंतर विल्यमसन म्हणाला, “या खेळपट्टीवर 240-250 चे लक्ष्य चांगले राहिल आणि या धावसंख्येवर आम्ही भारतावर दबाव आणू, असा आम्ही विचार केला होता. आमच्या खेळाडूंनी हे यशस्वीपणे करुन दाखवले. नव्या चेंडूला आमच्या गोलंदाजांनी खेळपट्टीवर आणि हवेत स्विंग करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला जागतिक स्तरावरील फलंदाजांवर दबाव आणायचा होता. खेळपट्टी संथ झाल्यानंतर त्याचा आम्हाला फायदा घ्यायचा आहे, हेही आम्ही ठरवले होते. मात्र, भारत जगातील सर्वोत्कृष्ट संघ का आहे हे त्यांनी दाखवून दिले. धोनी आणि जाडेजाने सामना शेवटपर्यंत नेला. त्यांनी हा सामना जिंकला देखील असता.”

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.