AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi: भारतीय संघाने स्वीकारली नाही ट्रॉफी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हणाले…

Womens Asia Cup 2026: भारतीय महिला संघाने आशिया कप जिंकला. आता त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट शेअर करत महिला संघाचे कौतुक केले आहे.

Narendra Modi: भारतीय संघाने स्वीकारली नाही ट्रॉफी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हणाले...
| Updated on: Sep 14, 2026 | 11:56 AM
Share

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी आशिया कप जिंकल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आणि दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून मिळवलेल्या सलग आठव्या विजयाबद्दल संघाचे कौतुक केले.

प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गडी गमावून १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ केवळ १११ धावांवर गारद झाला, ज्यामुळे भारताने ७२ धावांनी विजय मिळवला. भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला कारण आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष म्हणून पाकिस्तानचे मोहसिन नक्वी विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करणार होते.

पंतप्रधानांनी X ला टीम इंडियासाठी एक अभिनंदन संदेश लिहिला, ज्यात त्यांनी आशिया कपमधील विजयाला भारतासाठी एक अभिमानाचा क्षण म्हटले. त्यांनी लिहिले, “भारतीय क्रिकेटसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. आशिया कप जिंकल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन. त्यांचा आत्मविश्वास, सातत्य आणि उत्कृष्ट खेळ संपूर्ण स्पर्धेत दिसून आला. आशा आहे की, हा विजय देशातील लाखो तरुणांना खेळण्यासाठी आणि चमकण्यासाठी प्रेरणा देईल.”

राष्ट्रपती मुर्मू यांनी ट्विटरवर लिहिले की, महिला संघाने देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे आणि संघ यापुढेही अशीच ऐतिहासिक कामगिरी करत राहील अशी आशा व्यक्त केली. त्यांनी लिहिले, “महिला आशिया कप चॅम्पियनशिप २०२६ जिंकल्याबद्दल टीम इंडियाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळल्या आणि सर्व सामने जिंकल्या. त्यांनी देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखवली आहे. त्या आपल्या तरुणांसाठी, विशेषतः आपल्या मुलींसाठी प्रेरणा आहेत. मला खात्री आहे की त्या अशीच आणखी ऐतिहासिक पाने लिहील.”

भारतीय संघाने महिला आशिया कप २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. हे भारताचे सलग आठवे विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या श्रीलंकेवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ गडी गमावून १८३ धावा केल्या. श्रीलंकेची फलंदाजी अपयशी ठरली आणि शेवटच्या षटकात त्यांचा संघ १११ धावांवर सर्वबाद झाला. यापूर्वी २०२४ मध्ये श्रीलंकेने भारताला हरवून आशिया कप जिंकला होता.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ