AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्विनने पाय रचला, अश्विननेच कळस चढवला, टीम इंडियाच्या विजयाचा धडाकेबाज शिल्पकार

Ind vs Eng : भारताने इंग्लंडवर मिळवलेल्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू आर अश्विन (R Ashwin Chennai test) .

अश्विनने पाय रचला, अश्विननेच कळस चढवला, टीम इंडियाच्या विजयाचा धडाकेबाज शिल्पकार
रवीचंद्रन अश्विन
| Updated on: Feb 16, 2021 | 1:04 PM
Share

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने दणदणीत विजय (Team India win against England Chennai test) मिळवला. चेपॉकच्या मैदानात झालेला हा सामना साडेतीन दिवसातच आटोपला. भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 164 धावांत गुंडाळून, तब्बल 317 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. (India vs England 2nd test Team India win against England Chennai test). भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू आर अश्विन (R Ashwin Chennai test) .

भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 329 धावा केल्या होत्या. मग भारताने इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 134 धावांत गुंडाळून बॅकफूटवर ढकललं. पहिल्या डावात भारताला तब्बल 195 धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 286 धावा करुन, इंग्लंडसमोर विजयासाठी 481 धावांचं भलंमोठं आव्हान होतं. मात्र चेपॉकच्या मैदानात भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांत आटोपला आणि भारताने तब्बल 317 धावांनी मोठा विजय मिळवला.

आर अश्विनने पाय रचला, अश्विननेच कळस चढवला

भारताच्या या विजयात सर्वात मोठा वाटा उचलला तो फिरकीपटू ते अष्टपैलू अशी भूमिका बजावणाऱ्या आर अश्विनने. अश्विनने दुसऱ्या डावात आठव्या नंबरवर येऊन खणखणीत शतक ठोकलं. त्याआधी पहिल्या डावात त्याने इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला होता. इतकंच नाही तर त्याने दुसऱ्या डावातही 3 महत्त्वाच्या विकेट घेऊन, भारताच्या मोठ्या विजयाचा शिल्पकार ठरला.

पहिल्या डावात 5 विकेट

इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावांवर गुंडाळण्यात अश्विनने महत्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाच विकेट्स घेतल्या. स्टुअर्ट ब्रॉर्डला आऊट करत अश्विनने 5 विकेट्स पूर्ण केल्या. यासह अश्विन कसोटीमध्ये डावखुऱ्या फलंदाजांना 200 वेळा बाद करणारा पहिला फलंदाज ठरला.

आठव्या नंबरवर येऊन शतक

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात धमाकेदार शतक लगावलं. अश्विनने 134 चेंडूमध्ये हे शतक लगावलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 5 वं शतक ठरलं. अश्विनने एकूण 148 चेंडूत 1 सिक्स आणि 14 चौकारांच्या मदतीने खणखणीत 106 धावा केल्या. या खेळीसह अश्विनने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अश्विनने धोनीचा 8 व्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक शतक लगावण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला.

आर अश्विनची दुसऱ्या कसोटीतील कामगिरी

पहिला डाव

फलंदाजी – 13 धावा

गोलंदाजी – 23.5 षटकं, 4 मेडन, 43 धावा, 5 विकेट्स

दुसरा डाव

फलंदाजी – 148 चेंडूत 106 धावा, 14 चौकार आणि 1 षटकार

गोलंदाजी – 18 षटकं, 5 मेडन, 53 धावा, 3 विकेट्स

संबंधित बातम्या 

India vs England, 2nd Test | दमदार शतक, शानदार रेकॉर्ड, अश्विनची विक्रमाला गवसणी

रेकॉर्डब्रेक कामगिरीनंतर अश्विन म्हणाला, ‘सॉरी भज्जू पा’, हरभजनकडून मिळालं सॉलिड उत्तर

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.