AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

video : डीआरएस रिव्ह्यूबाबत रोहित शर्मानं विकेटकीपर श्रीकर भारतला स्पष्टच सांगितलं, “जर चुकून…”

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना अवघ्या काही तासात सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारतासाठी तिसऱ्या कसोटीतील विजय महत्त्वाचा असणार आहे.

video : डीआरएस रिव्ह्यूबाबत रोहित शर्मानं विकेटकीपर श्रीकर भारतला स्पष्टच सांगितलं, जर चुकून...
रोहित शर्मा विकेटकीपर श्रीकर भारतला डिआरएस रिव्ह्यूबाबत काय म्हणाला? Watch VideoImage Credit source: PTI
| Updated on: Feb 28, 2023 | 8:20 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना सुरु होण्यासाठी अवघ्या तासांचा अवधी शिल्लक आहे.या मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतल्याने ऑस्ट्रेलियावर सहाजिकच दबाव असणार आहे. तिसऱ्या सामन्यात कमबॅक करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जोरदार रणनिती करत आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ रणनितीनुसार ऑस्ट्रेलियाला खिंडीत पकडण्यास सज्ज आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत भारताचा विकेटकीपर श्रीकर भारत याने खुलासा केला आहे. डिआर रिव्ह्यूमध्ये विकेटकीपरची भूमिका मोलाची असते. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं हे करून दाखवलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे एकही विकेट हातून सुटू नये यासाठी रोहित शर्मानं त्याला कानमंत्र दिला आहे. रोहित शर्मानं नेमकं काय सांगितलं याबाबत श्रीकर भारतनं सांगितलं आहे.

“रोहित शर्मा माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, तू चांगल्या प्रकारे जज करतो. तसंच बॅट्समनच्या खूप जवळ उभा असतो. तेव्हा जे काही वाटेल ते मला निसंकोच सांग. तू, मी आणि गोलंदाज यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. जर चुकून आउट नाही झाला, तर चिंता करू नको. त्या क्षणाला तू काय फील केलं तो निर्णय सांग. जराही घाबरू नको.”, असं श्रीकर भारतनं पत्रकार परिषदेत सांगितलं.

तिसऱ्या कसोटीपूर्वीच्या सराव सामन्यात श्रीकर भारत चांगलाच घाम गाळला. प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली त्याने विकेटकीपिंगचा सराव केला. श्रीकर भारत पहिल्या कसोटी सामन्यातील एका डावात 10 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. टोड मर्फीच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन तंबूत परतला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात श्रीकर भारत 12 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. नाथन लियॉनच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथने त्याचा झेल घेतला.तर दुसऱ्या डावात 22 चेंडूत 23 धावा करून नाबाद राहिला.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव स्मिथ (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलैंड, एलेक्स कॅरी, कैमरून ग्रीन, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मैथ्यू कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मैथ्यू रेनशॉ ,मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

Follow Us
विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?
विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?.
उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा
उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा.
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?.
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.