AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : ऋतुराज गायकवाडचं शतक म्हणजे पराभवाची गॅरेंटी का? असं एकदा-दोनदा नाही, तर तब्बल…

IND vs SA : ऋतुराज गायकवाडने काल वनडे करिअरमधलं पहिलं शतक झळकावलं. या शतकामुळे टीम इंडियाला विजय मिळेल ही अपेक्षा होती. पण निकाल दुसराच लागला. दक्षिण आफ्रिकेने चार विकेटने हा सामना जिंकला.

IND vs SA : ऋतुराज गायकवाडचं शतक म्हणजे पराभवाची गॅरेंटी का? असं एकदा-दोनदा नाही, तर तब्बल...
ruturaj gaikwad
| Updated on: Dec 04, 2025 | 7:42 AM
Share

India vs South Africa : टीम इंडियात आपलं स्थान पक्क करण्यासाठी कुठल्याही फलंदाजाने मोठी इनिंग खेळणं आवश्यक आहे. खासकरुन भारताकडून खेळताना शतक झळकावणं प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं. शतकाच्या बळावर विजय मिळाला, तर आनंद द्विगुणित होतो. पण प्रत्येकवेळी शतकामुळे विजय मिळेलच असं होत नाही. खासकरुन ऋतुराज गायकवाड शतक झळकावतो, तेव्हा पराभव ठरलेला असतो, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे सामन्यात असचं झालं. ऋतुराज गायकवाड शानदार शतकी इनिंग खेळला. पण टीमला पराभवाचा सामना करावा लागला. हे असं पहिल्यांदा झालेलं नाही.

रायपूरमध्ये 3 डिसेंबरला म्हणजे काल भारत-दक्षिण आफ्रिका वनडे सीरीजमधला दुसरा सामना झाला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 358 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून विराट कोहलीने (102) सलग दुसरं शतक झळकावलं. पण ही मॅच जास्त खास बनली ते ऋतुराज गायकवाडच्या शतकामुळे. त्याने आपल्या वनडे करिअरमधील पहिलं शतक झळकावलं. ते ही 77 चेंडूत. गायकवाडने 83 चेंडूत 105 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 2 सिक्स होत्या.

हे असं पहिल्यांदा झालेलं नाही

ऋतुराज गायकवाडच्या शतकामुळे टीम इंडियाला विजय मिळेल ही अपेक्षा होती. पण निकाल दुसराच लागला. दक्षिण आफ्रिकेने चार विकेटने हा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने 358 धावांचं लक्ष्य पार केलं. भारतात भारताविरुद्ध हा सर्वात मोठा रन चेज आहे. गायकवाडने शतक झळकवूनही विजय मिळाला नाही. पण हे असं पहिल्यांदा झालेलं नाही.

ऋतुराज गायकवाडच्या शतकामुळे याआधी कधी हरलोय?

गायकवाडचं इंटरनॅशनल क्रिकेट करिअरमधील हे दुसरं शतक होतं. ही दोन्ही शतक झळकावली, तेव्हा टीम इंडियाचा पराभव झाला. याआधी 28 नोव्हेंबर 2023 रोजी गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सामन्यात गायकवाड 123 धावांची धुवाधार शतकी इनिंग खेळला होता. इंटरनॅशनल क्रिकेट करिअरमधील त्याचं हे पहिलं शतक होतं. पण ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या शतकाच्या बळावर 223 धावांच टार्गेट चेज केलं. भारताविरुद्ध टी 20 मधील हा सर्वात मोठं यशस्वी रन चेज आहे.

IPL मध्ये सुद्धा असच घडलं

फक्त टीम इंडियाच नाही, तर IPL मध्ये सुद्धा ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर असच घडलय. IPL च्या 18 सीजनच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी 10 वेळा शतकी खेळी केली. त्यात 2 वेळा पराभव झाला. या दोन्ही सेंच्युरी ऋतुराज गायकवाडने मारल्या होत्या. त्यावेळी CSK चा पराभव झाला. IPL 2021 मध्ये ऋतुराजने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 101 धावा फटकावल्या. पण राजस्थानने 190 धावांचं लक्ष्य पार केलं. त्यानंतर IPL 2024 मध्ये गायकवाडने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 108 धावा केल्या. त्यावेळी सुद्धा लखनऊच्या टीमने 211 धावांचं लक्ष्य पार केलं.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.