AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोएब अख्तर म्हणतो, ‘पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण…’

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंवरही झाला आहे. या हल्ल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग सारख्या अनेक बड्या खेळाडूंनी पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्यात यावे असा पवित्रा घेतला. तसेच येत्या विश्व चषकात भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना न खेळण्याचीही मागणी उठू लागली. यावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने […]

शोएब अख्तर म्हणतो, 'पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण...'
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंवरही झाला आहे. या हल्ल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग सारख्या अनेक बड्या खेळाडूंनी पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्यात यावे असा पवित्रा घेतला. तसेच येत्या विश्व चषकात भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना न खेळण्याचीही मागणी उठू लागली. यावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने त्याचं मत मांडलं आहे. भारताला पाकिस्तानसोबत न खेळण्याचा पूर्ण हक्क आहे, पण यावर राजकारण करु नये, असे शोएब म्हणाला.

रावलपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवांनांबाबत दु:ख व्यक्त केलं.

‘भारत त्या देशासोबत खेळायला नकार देऊ शकतो, ज्याने त्यांच्या देशासोबत वाईट केलं. पण माजी खेळाडू ज्याप्रकारे क्रिकेटला राजकारणाशी जोडत आहेत, ते चुकीचे आहे’, असे मत शोएबने एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना मांडले.

शोएबने पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बाजूही घेतली. ‘खेळात राजकारण व्हायला नको, मला याचं फार दु:ख आहे की भारताच्या जवानांना हे सर्व सहन कराव लागलं. पण माझ्या देशाबाबत सांगायचं झालं तर आम्ही सर्व एक आहोत. आमच्या मनात एकतेची भावना आहे आणि मी आमच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचं समर्थन करतो’, असेही तो म्हणाला.

‘भारताला विश्व चषकात पाकिस्तानसोबत सामना न खेळण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या देशावर आत्मघाती हल्ला झाला आहे. या विषयावर आम्ही चर्चा करणे बरोबर नाही’, असेही शोएब म्हणाला.

यातच बीसीसीआयचे प्रशासक विनोद राय यांनी सीईओ राहुल जोहरी यांना आयसीसीला पत्र पाठवून पाकिस्तानला विश्वचषकातून हटवण्यास सांगितलं आहे. तर दुसरीकडे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर विश्वचषकात पाकिस्तानसोबत सामना न खेळण्याच्या मागणीला विरोध केला आहे. जर भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळला नाही, तर नुकसान भारताचंच होईल, असं सुनील गावसकर म्हणाले. आयसीसी त्यासाठी प्रयत्न करु शकतात. मात्र, पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढण्याची मागणी मान्य होणार नाही. कारण यासाठी इतर देशांच्या सदस्यांनीही हे स्वीकारायला हवे आणि असं होणं शक्य नाही. त्यामुळे समना न खेळता पाकिस्तानला फुकटचे 2 गुण देण्यापेक्षा त्यांना मैदानात हरवा, असे गावस्कर म्हणाले.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा