AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: संघातील काही खेळाडूंनी शिकायला हवं की… इंग्लंडविरुद्ध मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी अतिशय वाईट पाहायला मिळाली. आता संघ नेमका कुठे कमी पडतोय यावर श्रेयस अय्यरने स्पष्टच आपले मत मांडले आहे.

IND vs ENG: संघातील काही खेळाडूंनी शिकायला हवं की... इंग्लंडविरुद्ध मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?
shreyas iyer
| Updated on: Jul 10, 2026 | 10:57 AM
Share

भरात आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी काही केल्या चांगली होत नाहीये. संघाने मालिका तर गमावली आहे आता उर्वरित एक सामना तरी जिंकायला जमतो की नाही असा चाहत्यांचा सवाल आहे. यजमान इंग्लंडने गुरुवारी रात्री ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार हॅरी ब्रूक इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. पण आता सामना गमावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने कोणावर पराभावाचा खापर फोडले ते पाहा…

ब्रूकने सर्वप्रथम 21 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूंमध्ये 59 धावांची नाबाद खेळी केली. भारताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या. पराभवानंतर श्रेयस अय्यर खूप नाराज दिसला. श्रेयस अय्यर म्हणाला, “पुन्हा एकदा, ही एक निराशाजनक कामगिरी होती. 158 धावांचे लक्ष्य अजिबात योग्य नव्हते. अखेरीस, त्यांनी किती वेगाने लक्ष्याचा पाठलाग केला हे आपण पाहिले. जेव्हा आम्ही गोलंदाजीसाठी आलो, तेव्हा मी गोलंदाजांना शक्यतोवर एकाच लेंथवर गोलंदाजी करण्यास सांगितले.”

तो म्हणाला, “मधल्या आणि वरच्या पायाच्या स्टंपवर धावा करणे अवघड होते. आम्ही आमचा डाव व्यवस्थित खेळू शकलो नाही. मी आमच्या कामगिरीवर आनंदी आहे, पण जर त्यामुळे विजय मिळत नसेल, तर हा एक संक्रमणाचा काळ आहे आणि चुका होणे अटळ आहे. हे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. मला खात्री आहे की संघात असे खेळाडू आहेत जे लवकर शिकतात. मला खात्री आहे की ते स्वतःमध्ये बदल करतील आणि पुढच्या सामन्यात अधिक मजबूत होऊन परत येतील.”

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर 20 षटकांत 7 गडी गमावून 158 धावा केल्या. शिवम दुबेने 22, अभिषेक शर्माने 16 आणि वैभव सूर्यवंशीने 15 धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडने कर्णधार हॅरी ब्रूक (79) आणि फिल सॉल्ट (59) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर अवघ्या 37 चेंडूंमध्ये सामना जिंकला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा