AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sourav Ganguly : लाज वाटते तुझी…सौरव गांगुलीची निंदा, नालस्ती, भारत-पाक सामन्यावरुन जे बोलला लोक खवळले

Sourav Ganguly : सध्या भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ट्रोलर्सच्या रडारवर आहे. सोशल मीडियावर त्याला भरपूर ट्रोल करण्यात येतय. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन सौरव गांगुली जे बोललाय त्यामुळे लोक खवळले आहेत.

Sourav Ganguly : लाज वाटते तुझी...सौरव गांगुलीची निंदा, नालस्ती, भारत-पाक सामन्यावरुन जे बोलला लोक खवळले
sourav ganguly
| Updated on: Jul 28, 2025 | 1:56 PM
Share

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुली आपल्या एका वक्तव्यामुळे पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. नुकतच त्याने आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. आशिया कप 2025 स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. या टुर्नामेंटमध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान 14 सप्टेंबरला ग्रुप स्टेजचा सामना होणार आहे. सौरव गांगुली या मॅचबद्दल असं काही बोलला की, ते चाहत्यांना अजिबात पटलं नाही. सौरव गांगुली आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हणाला की, खेळ झाला पाहिजे. सोबतच पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दलही मोठी गोष्ट बोलला.

सौरव गांगुली ANI शी बोलला. “मला काही समस्या नाही. खेळ सुरु राहिला पाहिजे. पहलगाममध्ये जे झालं, ते नाही झालं पाहिजे. पण खेळ सुरु राहिला पाहिजे. दहशतवाद असू नये. तो रोखलाच पाहिजे. भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत” सौरव गांगुलीच हे स्टेटमेंट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं.

पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी आणि नागरी वस्त्यांवर हल्ल्याचा प्रयत्न

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी हा हल्ला घडवून आणला. भारतात आजही लोक पहलगाम विसरलेले नाहीत. भारताने 7 ते 10 मे दरम्यान ऑपरेशन सिंदूर लॉन्च करुन पाकिस्तानला अद्दल घडवली. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली. पाकिस्तानने लष्करी आणि नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमन त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही.

सुनावल्यानंतर लीजेंड्स टीमचा नकार

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 टूर्नामेंटमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर खेळाडूंना भरपूर सुनावलं. त्यानंतर लीजेंड्स टीमने पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा निर्णय बदलला.

आशिया कप 2025 स्पर्धा कधी सुरु होतेय?

आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 28 सप्टेंबरला फायनल होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला UAE विरुद्ध आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा