AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील गावस्करांची भविष्यवाणी, भारत-इंग्लंड मालिका कोण जिंकणार, स्पष्टच सांगितलं!

भारत इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशा फरकाने हरवेल, अशी मोठी आणि महत्त्वाची भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली आहे. द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावस्कर यांनी ही भविष्यवाणी केलीये. (Sunil Gavaskar prediction India will beat England 4-0)

सुनील गावस्करांची भविष्यवाणी, भारत-इंग्लंड मालिका कोण जिंकणार, स्पष्टच सांगितलं!
Sunil Gavaskar
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jun 04, 2021 | 1:16 PM
Share

मुंबई :  कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये (India tour of England) पोहोचला आहे. भारताला या इंग्लंड दौऱ्यात एकूण सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका विराटसेना खेळेल. 18 जून ते 23 जून दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडशी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दोन हात करेल. ही मॅच साऊथहॅम्प्टन येथे होणार आहे आणि त्यानंतर भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. तत्पूर्वी भारताचे महान खेळाडू आणि क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी मोठी भविष्यवाणी केलीये. (Sunil Gavaskar prediction India will beat England 4-0)

गावस्करांची मोठी भविष्यवाणी

भारत इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशा फरकाने हरवेल, अशी मोठी आणि महत्त्वाची भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली आहे. द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावस्कर यांनी ही भविष्यवाणी केलीये. इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसरने प्रथम भारतीय संघ 5-0 अशा फरकाने जिंकेल, अशी भविष्यवाणी केली होती. त्यानंतर आता गावस्करांनी भविष्यवाणी केली आहे.

काय म्हणाले गावस्कर?

गावस्कर म्हणाले, “भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जून ते 23 जून दरम्यान होणार आहे. हा सामना झाल्यानंतर जवळपास चार ते पाच आठवड्यांनी भारताला इंग्लंड विरुद्धची मालिका खेळायची आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या निकालाचा कोणताही परिणाम भारतीय संघावर होणार नाही आणि त्याचमुळे भारतीय संघ कोणत्याही दडपणाशिवाय खेळेल. भारतीय संघातले सगळेच खेळाडू सध्या तुफान फॉर्मात आहेत. इंग्लंड विरुद्धची मालिका भारत 4-0 अशा फरकाने जिंकेल”

गावस्करांअगोदर पनेसरची भविष्यवाणी!

“भारतीय संघ अतिशय योग्य वेळी इंग्लंडचा दौरा करत आहे. कारण भारतीय संघातले सगळेच खेळाडू तुफान फॉर्मात आहेत. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमधील वातावरणात गरमी असेल. याचाच फायदा भारतीय संघ घेऊ शकतो. संघात दोन फिरकीपटूंना संधी देऊन इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 म्हणजेच क्लिन स्वीप देण्याची धमक भारतीय संघात आहे, अशी भविष्यवाणी माँन्टी पनेसरने केली प्रथमत: केली होती.

(Sunil Gavaskar prediction India will beat England 4-0)

हे ही वाचा :

Photo : विराट कोहली-अनुष्का शर्माचं मुंबईतलं घर कसं आहे? पाहा फोटो…

इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाच्या या खेळाडूने म्हटलं, ‘मला झोप येत नाही!’

डेवॉन कॉनवेने 125 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला, इंग्लंडमध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली