AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघ ‘या’ संघाविरुद्ध खेळणार टी-20 मालिका, बीसीसीआयने नकार कळवण्यामागचे कारण काय?

भारतीय संघाचे 2026 मधील वेळापत्रक खूप व्यस्त आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा प्रस्ताव दिला होता, परंतु तो फेटाळण्यात आला आहे. यामागील कारण आता समोर आले आहे.

भारतीय संघ 'या' संघाविरुद्ध खेळणार टी-20 मालिका, बीसीसीआयने नकार कळवण्यामागचे कारण काय?
team india
| Updated on: Jun 28, 2026 | 2:31 PM
Share

भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. जिथे दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहेत. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. ज्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळती. यातील एक सामना पारही पडला आहे ज्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. तर दुसरा सामना आज रंगणार आहे. इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहे तर तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. पण आता या दरमन्यान बीसीसीआयने श्रीलंका बोर्डाची विनंती रद्द केली आहे. श्रीलंका बोर्डाने भारतीय संघासोबत मालिका खेळण्याचा प्रस्ताव बीसीसीआयसमोर राखला होता पण बीसीसीआयने तो मान्य केला नाही.

भारतीय संघ ऑगस्ट 2026 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. श्रीलंका क्रिकेटने या दौऱ्यावर तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याचा प्रस्तावही दिला होता, परंतु आता आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने तो फेटाळला आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करण्यास नकार देण्यामागील कारणही समोर आले आहे.

श्रीलंका क्रिकेटने दौरा वाढवून टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. भारताचा सहभाग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल, अशी श्रीलंकाला बोर्डाला आशा होती. श्रीलंका दौऱ्यानंतर भारताच्या पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी सुमारे दोन आठवड्यांचे अंतर आहे. याच कारणास्तव, श्रीलंका क्रिकेटने तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता.

स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक आणि खेळाडूंवरील कामाचा ताण यामुळे बीसीसीआयने हा प्रस्ताव फेटाळला. अहवालात म्हटले आहे की, “सूत्रांनी पुष्टी केली आहे की दोन्ही मंडळांमधील चर्चेदरम्यान, बीसीसीआयने कळवले की ते या प्रस्तावावर पुढे जाऊ शकणार नाहीत. भारतीय मंडळाने भविष्यात अशी मालिका आयोजित करण्याची शक्यता नाकारलेली नाही.”

सध्या, भारतीय संघ केवळ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेचा दौरा करणार आहे. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्याचे नियोजन आहे. वृत्तानुसार, एक सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आणि एक एसएससी मैदानावर खेळला जाऊ शकतो.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा