AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटबाबत छेडछाड का? आयसीसीच्या प्रस्तावाला विराटचा विरोध

आयसीसीने कसोटी सामन्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावाला विराटने विरोध केला आहे.

क्रिकेटबाबत छेडछाड का? आयसीसीच्या प्रस्तावाला विराटचा विरोध
| Updated on: Jan 04, 2020 | 7:19 PM
Share

गुवाहाटी : आयसीसी पुढील काही वर्षांमध्ये चार दिवसांचा कसोटी सामना (bcci proposal of four day test match) सुरु करण्याचा विचार करत आहे. मात्र, आयसीसीच्या या प्रस्तावाला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने विरोध केला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी गुवाहाटी येथे टी 20 मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवरच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याच पत्रकार परिषदेत आयसीसीच्या प्रस्तावासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर विराटने प्रतिक्रिया दिली (bcci proposal of four day test match) .

नियमांनुसार टेस्ट सामना हा पाच दिवस चालतो. मात्र, व्यावसायिक दृष्टीकोनातून विचार करता आयसीसी 2023 ते 2031 दरम्यानचे पुढील आंतरराराष्ट्रीय कसोटी सामने चार दिवसांचा आखण्याचा विचार करत आहे. मात्र, या प्रस्तावाला विराट कोहलीने विरोध केला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून या प्रस्तावाचे समर्थन केले जात आहे.

भारतीय संघाचा बांगलादेशसोबत नुकताच डे-नाईट कसोटी सामना खेळला गेला. दरम्यान याबाबत विराट कोहलीला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, डे-नाईट कसोटी सामना हे क्रिकेटचे व्यावसायिकीकरणच्या पार्श्वभूमीवर पुढचे पाऊल आहे. मात्र, यापेक्षा जास्त छेडछाड केली जाऊ नये. हा एक पारंपरिक खेळ आहे. त्यामुळे कसोटी सामन्यात डे-नाईट पर्यंतचा बदलच भरपूर झाला.

‘पाच दिवसांचा कसोटी सामना तुम्ही चार दिवसांचा व्हावा, असे म्हणत आहात. काही दिवसांनी हाच कसोटी सामना तीन दिवसांचा व्हावा, अशी मागणी केली जाईल. हळूहळू कसोटी सामन्यांचा आणखी वेळ कमी होईल. त्यानंतर तुम्ही म्हणाल की, कसोटी सामना काळाच्या पळद्याआड गेला’, असे विराट म्हणाला.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.