Video | सूर्यकुमार यादवची अफलातून अर्धशतकी खेळी, कर्णधार विराटकडून कौतुक, म्हणाला….

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 57 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या या खेळीचं कौतुक केलं.

Video | सूर्यकुमार यादवची अफलातून अर्धशतकी खेळी, कर्णधार विराटकडून कौतुक, म्हणाला....
सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 57 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या या खेळीचं कौतुक केलं.
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 4:35 PM

अहमदाबाद : “सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) इशान किशनप्रमाणेच आपल्या पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली. हे दोघेही आयपीएलमध्ये निडरपणे खेळतात. पहिल्याच सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं आव्हानात्मक असतं. सूर्याने तिसऱ्या क्रमांकावर चांगली खेळी केली. आम्ही पाहून दंग राहिलो”, अशा शब्दात विराट कोहलीने (Virat Kohli) सूर्यकुमार यादवंच कौतुक केलं. इंग्लंडला चौथ्या सामन्यात पराभूत केल्यानंतर (India vs England 4th t20i) विराट बोलत होता. यावेळेस त्याने सूर्याचं कौतुक केलं. (virat kohli praised suryakumar yadav for his 57 scored innings)

हार्दिक पांड्याचं कौतुक

“हार्दिक पांड्या आणि रिषभ पंतने आपली भूमिका चोखपणे पार पाडली. मी या युवा खेळाडूंचा चाहता आहे. मी हार्दिकसाठी फार आनंदी आहे. कारण त्याने 4 ओव्हर बोलिंग केली. हार्दिकचं बोलिंग करणं हे आमच्यासाठी चांगले संकेत आहेत. हार्दिककडे गोलंदाजीसोबत चांगले स्किल आहे. त्याने 140 पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली. त्याने जेसन रॉयला आपल्या बोलिंगने बांधून ठेवलं. तसंच सॅम करनला बाद केलं”, असं म्हणत विराटने हार्दिकवर कौतुकाचा वर्षाव केला.

सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी

सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर अफलातून फलंदाजी केली. सूर्यकुमारने आपल्या पहिल्याच डावाचा श्रीगणेशा सिक्सर खेचत केला. त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सिक्स खेचला. सूर्याने या सामन्यात दणदणीत अर्धशतक झळकावलं. सूर्याने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे सूर्याला मैदानाबाहेर जावे लागले. सूर्याने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावांची अफलातून खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

मालिकेत 2-2 ने बरोबरी

टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

एकदिवसीय मालिकेतही संधी

दरम्यान उभय संघात टी 20 मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या मालिकेतही सूर्यकुमारला संधी मिळाली आहे. यामुळे सूर्या एकदिवसीय मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारण्याची हिंमत कुठून आली, शार्दुलच्या प्रश्नावर सूर्यकुमार काय म्हणाला?

6 बोल 23 रन्स, शार्दूलच्या हाती बोल, 2 वाईड, भारताची धडधड आणि रोहित शर्माची एन्ट्री, नेमकं काय घडलं?

(virat kohli praised suryakumar yadav for his 57 scored innings)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.