AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy 2025: विराट कोहलीमुळे गौतम गंभीर निराश ? चर्चांना उधाण, कोच म्हणाले…

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीचे शतक हुकले, पण त्याने 84 धावांची उत्तम खेळी केली. खरंतर विराट कोहली आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा तो बराच निराश दिसला. आता भारतीय संघाचे कोच

Champions Trophy 2025: विराट कोहलीमुळे गौतम गंभीर निराश ? चर्चांना उधाण, कोच म्हणाले...
विराट कोहली आणि गौतम गंभीर
| Updated on: Mar 06, 2025 | 11:04 AM
Share

Gautam Gambhir On Virat Kohli: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनमल मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायलनमध्ये ध़डक मारली. अव्वल क्रिकेटपटून विराट कोहली याने विजयातच सिंहाचा वाटा बजावला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळताना ओपनिंगला आलेले कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले, पण विराट कोहलीने टिकून रहात शानदार खेळी केली आणि भारताला विजयाच्या समीप पोहोचवले. या सामन्यात विराट कोहलीचे शतक हुकले, पण त्याने 84 धावांची चांगली खेळी केली. खरंतर विराट कोहली आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा तो भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी बोलत असल्याचे दिसले. यादरम्यान गौतम गंभीर निराश झालेला दिसला. विराटने उत्तम खेळश करूनही त्याचे शतक हुकल्याने गौतम गंभीर निराश होता.

काय म्हणाला गौतम गंभीर ?

त्यावेळी गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात काय संवाद झाला? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाने पत्रकार परिषदेत विराट कोहलीचे कौतुक केले. गौतम गंभीर म्हणाला की, विराट कोहली एक महान एकदिवसीय क्रिकेटपटू आहे. डाव कसा वाढवायचा हे त्यावा व्यवस्थित माहित आहे, मग तुम्ही लक्ष्य सेट करत असाल किंवा धावांचा पाठलाग करत असाल तरी विराट कोहली परिस्थितीशी झटपट जुळवून घेतो. अनुभवी आणि उच्च दर्जाच्या खेळाडूंनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं अशी तुमची अपेक्षा असते.विराट कोहली या फॉरमॅटमध्ये अप्रतिम आहे अशा शब्दांत गंभीरने त्याचं कौतुक केलं.

फायनलमध्ये न्युझीलंडशी पुन्हा होणार भारताचा सामना

येत्या रविवारी भारत आणि न्यूझीलंडचे संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशला हरवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. यानंतर ग्रुप स्टेज मॅचमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला. तर सेमीफायनलमध्येही विजयी खएळी टीम इंडियाने कायम ठेवली. त्यांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये थेट धडक मारली.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?