AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yashasvi Jaiswal : सिलेक्टर्सनी यशस्वी जैस्वालला मुंबईच्या टीममध्ये का स्थान दिलं नाही? अशी वेळ का आली?

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वाल टीम इंडियाचा टॉप क्रिकेटर आहे. पण त्याला मुंबईच्या टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. यशस्वी जैस्वाल सारख्या प्लेयरला टीम इंडियात का निवडलं नाही? त्यामागे काय कारणं आहेत? जाणून घ्या.

Yashasvi Jaiswal : सिलेक्टर्सनी यशस्वी जैस्वालला मुंबईच्या टीममध्ये का स्थान दिलं नाही? अशी वेळ का आली?
Yashasvi Jaiswal
| Updated on: Jan 26, 2026 | 2:42 PM
Share

आता रणजी ट्रॉफी सीजन सुरु आहे. जेतेपद मिळवण्यासाठी राज्याच्या क्रिकेट टीम्सनी कंबर कसली आहे. मुंबईने दिल्ली विरुद्ध लीग मधील शेवटच्या साखळी सामन्यात स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालला टीम बाहेर केलं. असं का केलं? त्या बद्दल मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या बद्दल खुलासा केला. यशस्वी जैस्वाल ठराविक निवडक सामने खेळत होता, म्हणून त्याला टीममध्ये स्थान दिलेलं नाही. टीम निवडण्याआधी होणाऱ्या बैठकीला त्याच्या उपलब्धतेविषयी कोणतीच माहिती मिळत नव्हती. यशस्वी जैस्वाल न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची टी 20 सीरीज खेळणाऱ्या टीमचा भाग नाहीय. पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी सुद्धा त्याचा टीममध्ये समावेश केलेला नाही.

भारतीय क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाच्या खेळाडूंना राष्ट्रीय टीममध्ये तुम्ही नसाल, तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ग्रुप स्टेजमधील काही सामन्यांच्या उपलब्धतेविषयी जैस्वालशी संपर्क साधण्यात आला. पण त्याच्याकडून काही उत्तर मिळालं नाही. एमसीएच्या एका सीनियर अधिकाऱ्याने रविवारी सांगितलं की, मागच्या हैदराबाद विरूद्धच्या सामन्याच्यावेळी टीम निवडीआधी त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नव्हता. असं दिसतय की तो निवडक सामने खेळतोय.

फक्त एक सामना खेळला आहे

आम्ही मागचे सामने आणि पुढचे येणारे सामने यासाठी टीम निवडण्याआधी त्याच्याशी संपर्क साधला होता. पण आम्हाला काही उत्तर मिळालं नाही, असं अधिकाऱ्याने सांगितलं. म्हणून दिल्ली विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी त्याचा टीममध्ये समावेश केलेला नाही. जैस्वाला चालू सत्रात रणजी ट्रॉफीमध्ये फक्त एक सामना खेळला आहे. यात जयपूरमध्ये राजस्थान विरुद्ध ड्रॉ झालेल्या सामन्यात त्याने 67 आणि 156 धावा केल्या होत्या.

मुंबईची वानखेडेवरची मॅच दुसरीकडे का हलवली?

डावखुऱ्या यशस्वी जैस्वालने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (टी20) आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले आहेत. शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे बाहेर आहे. सिद्धेश लाड मुंबईचं नेतृत्व करतोय. मुंबई आणि दिल्लीमधील सामना 29 जानेवारीला बीकेसी मैदानावर सुरु होणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर सात फेब्रुवारीला भारत आणि अमेरिकेत टी 20 वर्ल्ड कपचा पहिला सामना होणार आहे. त्यामुळे सामन्याचं ठिकाण बदलावं लागेल. मुंबईची टीम सहासामन्यात चार विजय आणि दोन ड्रॉ सह एलीट ग्रुप डी पॉइंट टेबलमध्ये टॉपवर आहे.

Follow Us
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण