AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yashasvi Jaiswal : सिलेक्टर्सनी यशस्वी जैस्वालला मुंबईच्या टीममध्ये का स्थान दिलं नाही? अशी वेळ का आली?

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वाल टीम इंडियाचा टॉप क्रिकेटर आहे. पण त्याला मुंबईच्या टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. यशस्वी जैस्वाल सारख्या प्लेयरला टीम इंडियात का निवडलं नाही? त्यामागे काय कारणं आहेत? जाणून घ्या.

Yashasvi Jaiswal : सिलेक्टर्सनी यशस्वी जैस्वालला मुंबईच्या टीममध्ये का स्थान दिलं नाही? अशी वेळ का आली?
Yashasvi Jaiswal
| Updated on: Jan 26, 2026 | 2:42 PM
Share

आता रणजी ट्रॉफी सीजन सुरु आहे. जेतेपद मिळवण्यासाठी राज्याच्या क्रिकेट टीम्सनी कंबर कसली आहे. मुंबईने दिल्ली विरुद्ध लीग मधील शेवटच्या साखळी सामन्यात स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालला टीम बाहेर केलं. असं का केलं? त्या बद्दल मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या बद्दल खुलासा केला. यशस्वी जैस्वाल ठराविक निवडक सामने खेळत होता, म्हणून त्याला टीममध्ये स्थान दिलेलं नाही. टीम निवडण्याआधी होणाऱ्या बैठकीला त्याच्या उपलब्धतेविषयी कोणतीच माहिती मिळत नव्हती. यशस्वी जैस्वाल न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची टी 20 सीरीज खेळणाऱ्या टीमचा भाग नाहीय. पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी सुद्धा त्याचा टीममध्ये समावेश केलेला नाही.

भारतीय क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाच्या खेळाडूंना राष्ट्रीय टीममध्ये तुम्ही नसाल, तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ग्रुप स्टेजमधील काही सामन्यांच्या उपलब्धतेविषयी जैस्वालशी संपर्क साधण्यात आला. पण त्याच्याकडून काही उत्तर मिळालं नाही. एमसीएच्या एका सीनियर अधिकाऱ्याने रविवारी सांगितलं की, मागच्या हैदराबाद विरूद्धच्या सामन्याच्यावेळी टीम निवडीआधी त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नव्हता. असं दिसतय की तो निवडक सामने खेळतोय.

फक्त एक सामना खेळला आहे

आम्ही मागचे सामने आणि पुढचे येणारे सामने यासाठी टीम निवडण्याआधी त्याच्याशी संपर्क साधला होता. पण आम्हाला काही उत्तर मिळालं नाही, असं अधिकाऱ्याने सांगितलं. म्हणून दिल्ली विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी त्याचा टीममध्ये समावेश केलेला नाही. जैस्वाला चालू सत्रात रणजी ट्रॉफीमध्ये फक्त एक सामना खेळला आहे. यात जयपूरमध्ये राजस्थान विरुद्ध ड्रॉ झालेल्या सामन्यात त्याने 67 आणि 156 धावा केल्या होत्या.

मुंबईची वानखेडेवरची मॅच दुसरीकडे का हलवली?

डावखुऱ्या यशस्वी जैस्वालने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (टी20) आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले आहेत. शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे बाहेर आहे. सिद्धेश लाड मुंबईचं नेतृत्व करतोय. मुंबई आणि दिल्लीमधील सामना 29 जानेवारीला बीकेसी मैदानावर सुरु होणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर सात फेब्रुवारीला भारत आणि अमेरिकेत टी 20 वर्ल्ड कपचा पहिला सामना होणार आहे. त्यामुळे सामन्याचं ठिकाण बदलावं लागेल. मुंबईची टीम सहासामन्यात चार विजय आणि दोन ड्रॉ सह एलीट ग्रुप डी पॉइंट टेबलमध्ये टॉपवर आहे.

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.