AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yuvraj Singh retired : मैदानात रक्ताची उलटी करुनही वर्ल्डकप जिंकून देणारा ढाण्या वाघ!

2011 च्या वर्ल्डकप दरम्यान उपांत्यपूर्व सामन्यात युवराजला भर मैदानात रक्ताच्या उलट्या झाल्या. मात्र याबाबत कोणलाही कल्पना लागली  नाही.

Yuvraj Singh retired : मैदानात रक्ताची उलटी करुनही वर्ल्डकप जिंकून देणारा ढाण्या वाघ!
| Updated on: Jun 10, 2019 | 3:32 PM
Share

मुंबई : युवराज सिंह म्हटलं की, आपल्याला आठवतं सहा चेंडू सहा षटकार.. पण यापुढे क्रिकेटच्या चाहत्यांना ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहची ही जादू किंवा त्याचा खेळ अनुभवता येणार नाही. कारण टीम इंडियाचा खेळाडू युवराज सिंहने क्रिकेटच्या सर्व प्रकरातून निवृत्ती जाहीर केली आहे. आज 10 जूनला मुंबईत पत्रकार परिषद घेत त्याने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी तो काहीसा भावूक झाला.

सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक 2019  रंगत असतानाच युवराज सिंगने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे भारतीय चाहते नाराज झाले आहेत. भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र 2011 च्या वर्ल्डकप दरम्यान उपांत्यपूर्व सामन्यात युवराजला भर मैदानात रक्ताच्या उलट्या झाल्या. मात्र याबाबत कोणलाही कल्पना लागली  नाही.

सिक्सर किंग युवराज हा 2011 च्या विश्वचषकातील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. या विश्वचषकातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा उपांत्यपूर्व सामना गुजरातच्या अहमदाबादच्या सरदार पटेल मैदानात खेळण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 260 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना भारताने 261 धावा करत विजय मिळवला.

मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान युवराज सिंहला रक्ताच्या उलट्या होत होत्या. एका बाजूला भारताचे गोलंदाज गोलंदाजी करत होते. तर दुसऱ्या बाजूला युवराज सिंहला रक्ताच्या उलट्या होत होत्या. याचं कारण म्हणजे कॅन्सर….मात्र त्या परिस्थितीतही तो डगमगला नाही. विशेष म्हणजे युवराजला रक्ताच्या उलट्या झाल्या. मात्र त्याने याबाबत कोणालाही सांगितले नाही.

तब्बल 28 वर्षानंतर विश्वचषक पुन्हा आपल्या नावे करण्याची भारताला ही एकमेव संधी होती. या विश्वचषकात युवराजने 8 सामने खेळले. त्यात त्याने 365 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने या सामन्यात गोलंदाजीही केली. 9 सामन्यात त्याने 15 खेळांडूना माघारी धाडले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे “जर युवराज या वर्ल्ड कप दरम्यान खेळला नसता, तर कदाचित मास्टर ब्लास्टर सचिनचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरं राहिलं असतं असं म्हटलं जातं”.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर युवराज कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत निघून गेला. यानंतर अनेकांनी तो पुन्हा कधीच खेळू शकणार नाही, त्याने निवृत्ती घ्यावी असे सांगितले होते. मात्र युवराजने कॅन्सरशी यशस्वीपणे झुंज दिली आणि पुन्हा त्याच जोशात क्रिकेटच्या मैदानात उतरला. क्रिकेटमध्ये दुसऱ्या संघांना धूळ चारण्यात यशस्वी ठरलेल्या युवराजने खऱ्या आयुष्यात कॅन्सरसारख्या आजारालाही मात दिली.

युवराज सिंहची क्रिकेट कारकीर्द

भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅन्सरचं निदान होऊनही युवराज सिंह ढाण्या वाघासारखा लढला होता.

युवराज सिंहने भारताकडून 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय युवराजने 40 कसोटी सामन्यात 1900 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी 20 स्पेशालिस्ट युवराजने 58 सामन्यात 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक