AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अॅपल कंपनी फ्रॉड, ग्राहकाची कोर्टात याचिका

वॉशिंग्टन : जगातील सर्वात विश्वसनीय मोबाईल ब्रॅंड अशी ओळख असणाऱ्या अॅपल कंपनीविरोधात एका युजर्सने कोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अॅपल कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये अनेक बिघाड होत आहे. बॅटरी चार्ज न होणे, बॅटरी फुगणे, चार्जिंगला लावलेला असताना बॅटरी अचानक गरम होणे, स्क्रीन फुगणे यांसारख्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जातात. पण याबाबत कंपनीकडून कोणतेही पाऊल उचलत […]

अॅपल कंपनी फ्रॉड, ग्राहकाची कोर्टात याचिका
अ‍ॅपल 7 जूनला लॉन्च करणार अनेक नवीन प्रोडक्ट्स
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

वॉशिंग्टन : जगातील सर्वात विश्वसनीय मोबाईल ब्रॅंड अशी ओळख असणाऱ्या अॅपल कंपनीविरोधात एका युजर्सने कोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अॅपल कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये अनेक बिघाड होत आहे. बॅटरी चार्ज न होणे, बॅटरी फुगणे, चार्जिंगला लावलेला असताना बॅटरी अचानक गरम होणे, स्क्रीन फुगणे यांसारख्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जातात. पण याबाबत कंपनीकडून कोणतेही पाऊल उचलत नसल्याने एका ग्राहकाने अॅपलविरोधात अमेरिकेतील न्यूजर्सी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

एका ग्राहकाने ऑक्टोबर 2017 मध्ये अॅपल सीरीज 3 स्मार्टवॉच खरेदी केले होते. पण जुलै  2018 मध्ये यातील एक स्मार्टवॉच चार्जिंगला लावताना अचानक या स्मार्टवॉचची स्क्रीन बाहेर आली. तसेच त्याच्या स्क्रीनवर चिरा पडल्या. यानंतर त्या ग्राहकाने हे स्मार्टवॉच नीट करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ते पूर्ण बंद पडलं. त्यानंतर ग्राहकाने याबाबत कंपनीकडे तक्रार केली, पण कंपनीने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकाने न्यू जर्सीतील कोर्टात याचिका दाखल केली.

या याचिकेमध्ये ग्राहकाने अॅपल कंपनी फ्रॉड आहे. या कंपनीच्या फोनपासून स्मार्टवॉचपर्यंतच्या सर्व गोष्टी खराब आहेत. ग्राहकांनी त्या खरेदी करु नये. त्यात अनेक तांत्रिक अडचणी आहे आणि त्याला सर्वस्वी कंपनी जबाबदार आहे. विशेष म्हणजे ही कंपनी त्यांच्या स्मार्टवॉचवर डिस्काऊंट वॉरंटीही देत नाही. याआधी ही अॅपलच्या स्मार्टवॉचबाबत अनेकांनी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी बॅटरी फुगणे, चार्जिंगवेळी स्मार्टवॉच गरम होणे, स्मार्टवॉच जळणे या तक्रारींचा समावेश होता. त्यावेळी अनेक ग्राहकांनी याबाबतचे पुरावेही दिले होते. फक्त स्मार्टवॉच नव्हे तर स्मार्टफोनबाबतही अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पण त्यावेळीही कंपनीद्वारे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.

दरम्यान सध्या वादात अडकलेल्या अॅपल कंपनींद्वारे लवकरच एक स्मार्टवॉच लाँच करण्यात आलं आहे. त्या स्मार्टवॉचची ओएलईडी स्क्रीन देण्यात येणार आहे. जपानच्या डिस्प्ले इंक कंपनीद्वारे ही स्क्रीन तयार करण्यात येणार आहे. याच कंपनीद्वारे आयफोन एक्स या स्मार्टफोनची स्क्रीन तयार करण्यात आली होती.

Follow Us
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...