AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचा नवा नियम लागू, ‘हे’ केलं नाही तर रेशन कार्डाचे सर्व फायदे होतील बंद !

रेशन कार्डाची केवायसी ही सरकारची चांगली मोहीम आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आला बसेन आणि सर्वसामान्य गरजू जनतेलका याचा फायदा होईल.

सरकारचा नवा नियम लागू, 'हे' केलं नाही तर रेशन कार्डाचे सर्व फायदे होतील बंद !
Complete This process of kyc or Lose Ration Card BenefitsImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 01, 2025 | 8:29 PM
Share

रेशन कार्डाचे फायदे आपल्या सर्वांना माहितीच आहेत. यामुळे दरमहा रेशन तर मिळतंच, पण त्याशिवाय इतरही अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण अलीकडे राष्ट्रीय अन्न व रसद विभागाने रेशन कार्डाची ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे. नाहीतर रेशन कार्डाचे सर्व फायदे बंद होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया कशी करायची, ती का गरजेची आहे आणि त्याचे फायदे काय आहेत, हे सविस्तर जाणून घेऊया.

रेशन कार्डाची केवायसी म्हणजे काय?

रेशन कार्डाची केवायसी म्हणजे ‘नो युवर कस्टमर’ (Know Your Customer). ही भारत सरकारची एक योजना आहे. याचा उद्देश रेशन कार्ड धारकांची ओळख पडताळणं आणि बनावट रेशन कार्डांना आळा घालणं आहे. या प्रक्रियेमुळे फक्त पात्र व्यक्तींनाच सरकारी योजनांचा लाभ मिळेल, असं सरकारचं ध्येय आहे.

रेशन कार्डाची केवायसी का गरजेची आहे?

पात्रतेची खात्री: केवायसीमुळे फक्त पात्र लोकांनाच रेशनची सबसिडी मिळेल आणि बनावट रेशन कार्डांचा वापर थांबेल. कार्यक्षम वितरण: केवायसी डेटाच्या आधारे सरकार सबसिडीचं वितरण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल आणि ती खऱ्या गरजूंना मिळतेय का, हे तपासू शकेल. ऑनलाइन सुधारणा: केवायसीमुळे रेशन कार्डाच्या सेवा ऑनलाइन आणि पारदर्शी होतील, ज्यामुळे सर्वसामान्यांना फायदा होईल. याशिवाय, ही प्रक्रिया भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठीही महत्त्वाची आहे, कारण अनेकदा बनावट कागदपत्रांद्वारे सबसिडीचा गैरवापर होतो.

रेशन कार्ड केवायसीचे फायदे

केवायसी पूर्ण केलेल्या रेशन कार्ड धारकांनाच सरकारी सबसिडी मिळेल. ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यासाठी आणि रेशन कार्डाशी संबंधित सुविधा सहज मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे. बनावट रेशन कार्डांचा वापर आणि सबसिडीचा दुरुपयोग थांबवण्यात ही प्रक्रिया मदत करेल.

रेशन कार्डाची केवायसी कशी करायची?

रेशन कार्डाची केवायसी करण्याचे दोन पर्याय आहेत. एक ऑनलाइन आणि ऑफलाइन. दोन्ही पद्धती सोप्या आहेत, पण त्यासाठी काही कागदपत्रं तयार ठेवावी लागतील.

ऑनलाइन केवायसी कशी करावी ?

1. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलवर (https://nfsa.gov.in/) जा. 2. ‘KYC’ टॅबवर क्लिक करा. 3. तुमचा रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक टाका. 4. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. 5. ‘सबमिट’ बटण दाबा आणि तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.

ऑफलाइन केवायसी कशी करावी

1. जवळच्या रेशन दुकानात जा. 2. केवायसी अर्ज भरून द्या. 3. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जमा करा. 4. अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यावर तुमची केवायसी पूर्ण होईल.

या साठी आवश्यक कागदपत्रं कोणती आहेत

1. रेशन कार्ड 2. आधार कार्ड 3. पॅन कार्ड (पर्यायी) 4. मतदार ओळखपत्र (पर्यायी) 5. पासपोर्ट (पर्यायी) 6. बँक पासबुक

(डिस्क्लेमर: तुमच्या रेशन कार्डाची स्थिती ऑनलाइन किंवा रेशन दुकानात तपासता येईल. केवायसी प्रक्रियेत अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.