AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट्सअप खरंच रात्री 11.30 ते सकाळी 6 बंद राहणार?

फेसबुक आणि व्हॉट्सअपवर तर अनेक मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले जातात. आता व्हॉट्सअपविषयीचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हॉट्सअप खरंच रात्री 11.30 ते सकाळी 6 बंद राहणार?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 04, 2019 | 9:01 PM
Share

मुंबई : आजच्या युगात सोशल मीडिया अनेक लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर तर अनेक मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले जातात. आता व्हॉट्सअपविषयीचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात दररोज रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत व्हॉट्सअप बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच संबंधित मेसेज 48 तासात आपल्या संपर्क यादीतील लोकांना फॉरवर्ड केला नाही, तर तुमचे खाते बंद होईल. हे बंद खाते सुरु करण्यासाठी 499 रुपये द्यावे लागतील, असेही सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या या मेसेजमधील या दाव्याने अनेक युजर्स बुचकळ्यात पडले आहेत. काहींनी तर धोका पत्करायला नको म्हणून हे मेसेज पुढे पाठवायलाही सुरुवात केली आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे, “यापुढे भारतात रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत व्हॉट्सअपचा वापर करता येणार नाही. या वेळेत व्हॉट्सअप पूर्णपणे बंद असेल. मोदी सरकार व्हॉट्सअपच्या वापराबाबत लवकरच एक नवा कायदा आणणार आहे. हा मेसेज 48 तासात आपल्या संपर्क यादीतील 10 लोकांना फॉरवर्ड केला नाही, तर तुमचे खाते बंद होईल. हे बंद खाते सुरु करण्यासाठी 499 रुपये द्यावे लागतील.”

या दाव्यामागील वास्तव काय?

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अशा प्रकारची कोणतीही अधिकृत सुचना दिलेली नाही. तसेच कोणत्याही सोशल मीडिया कंपनीने याची अधिकृत घोषणा केलेली नाही. संबंधित दावा पूर्णपणे खोटा आहे. संबंधित मेसेज पुढे फॉरवर्ड केला नाही तर तुमचे व्हॉट्सअप बंद होईल आणि पुन्हा सुरु करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी कोणतीही भिती बाळगण्याचे कारण नाही.

खरंतर बुधवारी (3 जुलै) व्हॉट्सअप, फेसबूक आणि इंस्टाग्रामची सेवा 9 तासांसाठी ठप्प झाली होती. या काळात व्हॉट्सअप युजर्सला फोटो अपलोड किंवा डाऊनलोड करण्यात अडथळे येत होते. याचाच फायदा उठवत संबंधित खोटा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला.

दरम्यान, आज एअरटेल कंपनीने आपल्या सर्व ग्राहकांना मेसेज पाठवत असे अडथळे आले होते आणि आता ते दूर करण्यात आल्याचे अधिकृतपणे कळवले आहे.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...