AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट्सअप खरंच रात्री 11.30 ते सकाळी 6 बंद राहणार?

फेसबुक आणि व्हॉट्सअपवर तर अनेक मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले जातात. आता व्हॉट्सअपविषयीचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हॉट्सअप खरंच रात्री 11.30 ते सकाळी 6 बंद राहणार?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 04, 2019 | 9:01 PM
Share

मुंबई : आजच्या युगात सोशल मीडिया अनेक लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर तर अनेक मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले जातात. आता व्हॉट्सअपविषयीचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात दररोज रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत व्हॉट्सअप बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच संबंधित मेसेज 48 तासात आपल्या संपर्क यादीतील लोकांना फॉरवर्ड केला नाही, तर तुमचे खाते बंद होईल. हे बंद खाते सुरु करण्यासाठी 499 रुपये द्यावे लागतील, असेही सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या या मेसेजमधील या दाव्याने अनेक युजर्स बुचकळ्यात पडले आहेत. काहींनी तर धोका पत्करायला नको म्हणून हे मेसेज पुढे पाठवायलाही सुरुवात केली आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे, “यापुढे भारतात रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत व्हॉट्सअपचा वापर करता येणार नाही. या वेळेत व्हॉट्सअप पूर्णपणे बंद असेल. मोदी सरकार व्हॉट्सअपच्या वापराबाबत लवकरच एक नवा कायदा आणणार आहे. हा मेसेज 48 तासात आपल्या संपर्क यादीतील 10 लोकांना फॉरवर्ड केला नाही, तर तुमचे खाते बंद होईल. हे बंद खाते सुरु करण्यासाठी 499 रुपये द्यावे लागतील.”

या दाव्यामागील वास्तव काय?

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अशा प्रकारची कोणतीही अधिकृत सुचना दिलेली नाही. तसेच कोणत्याही सोशल मीडिया कंपनीने याची अधिकृत घोषणा केलेली नाही. संबंधित दावा पूर्णपणे खोटा आहे. संबंधित मेसेज पुढे फॉरवर्ड केला नाही तर तुमचे व्हॉट्सअप बंद होईल आणि पुन्हा सुरु करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी कोणतीही भिती बाळगण्याचे कारण नाही.

खरंतर बुधवारी (3 जुलै) व्हॉट्सअप, फेसबूक आणि इंस्टाग्रामची सेवा 9 तासांसाठी ठप्प झाली होती. या काळात व्हॉट्सअप युजर्सला फोटो अपलोड किंवा डाऊनलोड करण्यात अडथळे येत होते. याचाच फायदा उठवत संबंधित खोटा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला.

दरम्यान, आज एअरटेल कंपनीने आपल्या सर्व ग्राहकांना मेसेज पाठवत असे अडथळे आले होते आणि आता ते दूर करण्यात आल्याचे अधिकृतपणे कळवले आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली