AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार्कशीटसाठी प्रभू श्रीरामाला पत्र; उडाली एकच खळबळ, या विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने का निवडला हा मार्ग?

Student Letter to Prabhu Ram for Marksheet : विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका एका विद्यार्थ्याला बसला. उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने या विद्यार्थ्याने गुणपत्रिकेसाठी थेट देवालाच साकडे घातले. त्याची देशभरात चर्चा होत आहे.

मार्कशीटसाठी प्रभू श्रीरामाला पत्र; उडाली एकच खळबळ, या विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने का निवडला हा मार्ग?
गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्याचे अनोखे पत्र
| Updated on: Feb 11, 2025 | 4:35 PM
Share

शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, विद्यापीठातील कारभार हा राम भरोसे आहे, असे आपण अनेकदा ऐकतो. परीक्षा घोटाळे, पेपर फुटी, बोगस पदव्या अशा एक ना अनेक मुद्यांनी शैक्षणिक सत्र बदनाम झाले आहे. असाच विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका एका विद्यार्थ्याला बसला. उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने या विद्यार्थ्याने गुणपत्रिकेसाठी थेट देवालाच साकडे घातले. त्याची देशभरात चर्चा होत आहे.

प्रभू श्रीरामाला पत्र

आगरा येथील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठातील गलथान कारभार समोर आला आहे. विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून या विद्यार्थ्याने प्रभू श्रीरामाला पत्र लिहिले. त्यात विद्यापीठाची आणि कर्मचाऱ्यांची तक्रार केली. आशिष प्रिंस या विद्यार्थ्याने हे पत्र लिहिले आहे. त्याने योग या विषयात पदव्युत्तर पदवी (MA) करत आहे. पण विद्यापीठाने त्याला दोन महिन्यांपासून गुणपत्रिकाच दिली नाही. अखेर वैतागून त्याने प्रभू श्रीरामालाच पत्र लिहिले. ते पत्र व्हायरल झाले आहे.

चूक विद्यापीठाची पण फटका विद्यार्थ्याला

आशिष प्रिंसला केवळ एका सेमिस्टरची गुणपत्रिका देण्यात आली असे नाही तर दुसरे, तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरची पण गुणपत्रिका देण्यात आलेली नाही. त्यामुळे तो जाम वैतागला आहे. विद्यापीठाने त्याचा आसन क्रमांकात काही तरी चूक केली आणि त्याचा फटका त्याला बसला. त्याने गुणपत्रिकेसाठी अनेकदा विद्यापीठाशी संपर्क केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. IGRS Portal वर त्याने तक्रार सुद्धा दाखल केली आहे. पण त्यावरही निर्णय झाला नाही.

थेट प्रभू श्रीरामाला पत्र

अनेकदा तक्रार करुनही काहीच उपयोग होत नसल्याने त्याने थेट प्रभू श्रीरामाला पत्र लिहिले. ‘हे देवा, मी आपल्याकडे प्रार्थना करतो की, माझी गुणपत्रिका मला मिळवून द्यावी.’ अशी विनंती त्याने पत्रात केली आहे. त्याने पोस्टाद्वारे हे पत्र प्रभू श्रीरामाला पाठवले आहे. त्याचे पत्र समाज माध्यमात चर्चेचा विषय ठरलेले आहे.  आता देवच आपल्याला न्याय देऊ शकतो, अशी प्रतिक्रिया आशिष प्रिंसने दिली आहे.

संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका.
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार.
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर....
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर.....
चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला
चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला.
टिपूच्या नावाने भाजपच्या टिपऱ्या; सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?
टिपूच्या नावाने भाजपच्या टिपऱ्या; सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?.
जनतेच्या प्रश्नांवर भाजपने कधी आंदोलन केले का? – संजय राऊतांचा सवाल
जनतेच्या प्रश्नांवर भाजपने कधी आंदोलन केले का? – संजय राऊतांचा सवाल.
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारण्याची धमकी! करुणा शर्मांचा आरोप
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारण्याची धमकी! करुणा शर्मांचा आरोप.
पुन्हा स्वगृही यावं, लढाईचं रणशिंग फुंकावं! राऊतांची गणेश नाईकांना ऑफर
पुन्हा स्वगृही यावं, लढाईचं रणशिंग फुंकावं! राऊतांची गणेश नाईकांना ऑफर.
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?.
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान.