AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चालत्या ट्रेनमध्ये आशुतोष महाराजांवर जीवघेणा हल्ला, जीव वाचवण्यासाठी थेट…, नेमकं काय घडलं?

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या गुन्हा दाखल करणारे आशुतोष ब्रह्मचारी यांच्या चालत्या ट्रेनमध्ये जीवघेणा हल्ला. जीव वाचवण्यासाठी थेट घुसले टॉयलेटमध्ये. पुढे काय झालं?

चालत्या ट्रेनमध्ये आशुतोष महाराजांवर जीवघेणा हल्ला, जीव वाचवण्यासाठी थेट..., नेमकं काय घडलं?
| Updated on: Mar 08, 2026 | 11:21 AM
Share

Ashutosh Brahmachari : प्रयागराज येथे पोहोचण्यापूर्वी रीवा एक्सप्रेसमध्ये आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामागे कट असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. दुसरीकडे शंकराचार्यांनी हे सर्व आरोप फेटाळत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष ब्रह्मचारी यांनी यापूर्वी प्रयागराज येथे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरोधात अल्पवयीनांवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता त्यांच्या वरच हल्ला झाल्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

आशुतोष ब्रह्मचारी यांनी सांगितले की ते गाझियाबाद येथून प्रयागराजकडे रीवा एक्सप्रेसने प्रवास करत होते. ते ट्रेनच्या एच-1 कोचमध्ये होते. फतेहपूर आणि सिराथू रेल्वे स्टेशन यांच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जीव वाचवण्यासाठी टॉयलेटचा घेतला आसरा

आशुतोष ब्रह्मचारी यांच्या मते, हल्लेखोर अचानक त्यांच्या जवळ आला आणि वार करू लागला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ट्रेनच्या टॉयलेटमध्ये स्वतःला बंद करून घेतले. हल्लेखोराच्या हातात धारदार शस्त्र होते आणि त्याने त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी सांगितले.

या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. ट्रेन प्रयागराज जंक्शन येथे पोहोचल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शंकराचार्यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आशुतोष ब्रह्मचारी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. चौकशीनंतर सत्य स्पष्ट होईल आणि दूध का दूध पानी का पानी होईल असेही त्यांनी म्हटले.

यासोबतच त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर आशुतोष ब्रह्मचारी ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जाताना व्यवस्थित होते आणि बाहेर येताना हल्ला झाल्याचा दावा करत असतील तर हा प्रकार संशयास्पद वाटतो. त्यांनी असा आरोपही केला की ही संपूर्ण कथा बनावटी असू शकते आणि सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा सुरक्षा मिळवण्यासाठी हा प्रयत्न असू शकतो. या घटनेनंतर जीआरपी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम