AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनंत अंबानींनी 108 किलो वजन कमी कसं केलं होतं? अनेक बॉलिवूड स्टारचाही तोच फिटनेस ट्रेनर

अनंत यांना अस्थमा होता असल्याने त्याची औषधे त्यांना सुरू होती, त्यामुळे त्यांचे वजन वाढले होते आणि शरीरदेखील मोठे होऊ लागले होते.

अनंत अंबानींनी 108 किलो वजन कमी कसं केलं होतं? अनेक बॉलिवूड स्टारचाही तोच फिटनेस ट्रेनर
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 17, 2022 | 4:16 PM
Share

मुंबई : आपलं वजन आणि फिटनेस उत्तम राहावा यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्ट प्रयत्न करीत असतात, त्यासाठी चांगला फिटनेस ट्रेनर मिळवा यासाठी शोध घेतला जातो. असाच शोध अनंत अंबानी यांनी काही दिवसापूर्वी घेतला होता आणि तब्बल 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी करून दाखविले होते. वजन कमी केल्याच्या या बातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर अनंत यांनी इतके वजन कमी कसे केले ? वजन करण्यासाठी कुठला फिटनेस ट्रेनरची मदत घेतली ? कोणत्या टिप्स वापरल्या अशा विविध चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या होत्या. त्याचं उत्तर एकच होतं ते म्हणजे फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना. विनोद चन्ना यांनीच अनंत अंबानी यांचे वजन कमी केले होते. याबाबत विनोद यांनी काही टिप्स शेयर केल्या असून अनंत अंबानी यांचे वजन कमी कसे झाले हे सांगितले आहे.

अनंत यांच्याशिवाय विनोद चन्ना बॉलिवूडमधील अनेक स्टार्सला प्रशिक्षण देत आहे, यामध्ये जॉन अब्राहम, शिल्पा शेट्टी, आयुष्मान खुराना आणि रितेश देशमुख यांसारख्या बड्या स्टार्सना ट्रेनिंग देतो आणि डायट प्लॅनही देतो.

विनोद चन्ना यांच्या माहितीनुसार, अनंत अंबानी यांचे वजन कमी करण्यासाठी फक्त नैसर्गिक पद्धतींचा वापर करण्यात आला असून सुरक्षित पद्धत म्हणून ओळख आहे.

अनंत यांना अस्थमा होता असल्याने त्याची औषधे त्यांना सुरू होती, त्यामुळे त्यांचे वजन वाढले होते आणि शरीरदेखील मोठे होऊ लागले होते.

अनंत यांची आरोग्यची स्थिती जाणूनच त्यांचा डायट प्लॅन तयार करण्यात आला होता, याशिवाय दररोज पाच ते सहा तासांचा व्यायाम आणि दररोज 20 किलोमीटर चालणे असा समावेश होता.

विशेष म्हणजे हा सर्व प्लॅन अनंत यांच्या मुंबईतील घरीच केला जात होता, फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना हे घरी जाऊन अनंत यांच्याकडून सर्व करून घेत होते.

डायट प्लॅनमध्ये साखरचा वापर नसेल असे अन्न दिले जात होते, फळे, पनीर आणि भाज्यांचा त्यांच्या आहारात समावेश होता. यासोबतच गाईचे दूध, धान्य आणि सूपही आहाराचा भाग होता.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात