AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात किटक आणि डासांचा त्रास सतावतोय? तर करा ‘हे’ सोपे उपाय

पावसाळ्यात हवामान आल्हाददायक असते. तसेच या वातावरणात दमटपणा व आर्द्रता असल्याने कीटक व डासांचे प्रमाण वाढतं. तुम्हालाही डास, माश्या,आणि किटक घरात येऊ नये असे वाटत असेल तर काही सोपे उपाय आहेत तुम्हाला अगदी सहज वापरता येतील. चला तर मग जाणून घेऊयात...

पावसाळ्यात किटक आणि डासांचा त्रास सतावतोय? तर करा 'हे' सोपे उपाय
rainy insectsImage Credit source: Tv9 Gujarati/Google
| Edited By: | Updated on: Jun 22, 2025 | 2:09 AM
Share

पावसाळा हा ऋतू हिरवळ आणि थंड वातावरणाने मनाला शांत करतो, तसेच पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा हवामान आल्हाददायक होते. पण त्याचवेळी वातावरणातील आर्द्रता निर्माण झाले की डास, कीटक, माश्या यांचा त्रास सुरू होतो. या किटकांमुळे आपण आजारी पडण्याचीही शक्यता असते. तसेच पावसाळ्यात पाण्यात प्रजनन करणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची दहशत दरवर्षी दिसून येते. यामुळे आपल्याला आजार बळावतात, म्हणून आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. काही खबरदारी घेण्यासोबतच, असे उपाय देखील आहेत जे कीटकांना दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.

पावसाळ्यात, स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, विशेषतः जिथे उघड्यावर वस्तू ठेवल्या जातात तिथे ओलावा किंवा घाण येऊ देऊ नये. तसेच घरातील व घराबाहेरील कोपऱ्यांवरील ओलावा दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबतच, भांडी, पेट्या, रिकामे टायर इत्यादींमध्ये पाणी भरू देऊ नये. तसेच तुमच्या आरोग्याला कोणतेही नुकसान न होता किटक व डास हे घरात येऊ नये यासाठी कोणते सोपे नैसर्गिक उपाय करता येतील ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात…

कापूर आणि तमालपत्र

आपल्या प्रत्येकांच्या स्वयंपाकघरात तमालपत्र सहज मिळते आणि देवघरात असलेला कापूर. तर या दोन्ही गोष्टी कीटक आणि डासांना दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तमालपत्राचे लहान तुकडे करा आणि ते एका लहान मातीच्या किंवा धातूच्या भांड्यात ठेवा आणि नंतर त्यात थोडे कापूर टाका. आता कापूर पेटवल्यानंतर विझवा. आता यातून निघणारा धूर तुम्ही संपूर्ण घरातील कोपऱ्यावर तसेच घरात दाखवा. त्यामुळे कोपऱ्यात लपलेले डास आणि कीटक पळून जातील.

बेकिंग सोडा

मिरची आणि बेकिंग सोडा हे देखील आपल्या घरात असतात. जर तुम्हाला पावसाळ्यात कीटक आणि मुंग्यांचा त्रास होत असेल, तर या दोन्ही गोष्टी एकत्र करा आणि त्यात काही थेंब पाणी टाका. आता याचे लहान गोळे बनवा आणि ते कोपऱ्यात तसेच खिडक्यांच्या गॅप असलेल्या ठिकाणी ठेवा. यामुळे झुरळे, ओलाव्यामुळे येणारे कीटक आणि मुंग्या दूर होतील.

हे नैसर्गिक स्प्रे बनवा

जर स्वयंपाकघर किंवा बाथरूमच्या कोपऱ्यात पावसाळी कीटक असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करा. त्यात थोडे पाणी टाकून कोपऱ्यात शिंपडा, तुम्ही ते खिडक्यांच्या कडा, दरवाजांच्या कडा इत्यादींवर देखील स्प्रे करू शकता. यामुळे किटक घरात येत नाहीत.

कडुलिंब उपयोगी पडतो

घरात कोरड्या कडुलिंबाची पाने जाळल्याने त्याच्या धुरामुळे कीटक आणि डास दूर राहतात. याशिवाय सुक्या कडुलिंबाची पाने कपाटात ठेवता येतात. कीटकांना दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाचे तेल देखील वापरले जाऊ शकते. कडुलिंबाच्या तेलात कापसाचा गोळा भिजवा आणि कोपऱ्यात ठेवा. यामुळे किटक, डास, मुंग्या व माश्या घरात येत नाही.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...