AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिसाईल हल्ल्याची भीती! अचानक मोबाइलवर आलेल्या अलर्टने नागरिकांमध्ये भीती, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

भारतात अनेक लोकांच्या मोबाईलवर अचानक आपत्कालीन संदेशचा मोठा गरज वाजत एक संदेश आला. जो ऐकून काही क्षणासाठी लोक प्रचंड घाबरले. आता याच संदेशाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहेत.

मिसाईल हल्ल्याची भीती! अचानक मोबाइलवर आलेल्या अलर्टने नागरिकांमध्ये भीती, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Image Credit source: Social media
| Updated on: May 02, 2026 | 3:23 PM
Share

देशभरातील अनेक नागरिकांच्या मोबाईल फोनवर अचानक मोठ्या आवाजासह इमरजन्सी अलर्ट आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना सुरुवातीला हा कोणता तरी गंभीर धोका असल्याचे वाटले. मात्र, नंतर स्पष्ट झाले की हा कोणताही आपत्कालीन प्रसंग नसून भारत सरकार कडून आपत्ती इशारा प्रणालीची चाचणी (टेस्टिंग) सुरू होती.

या अलर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, हा केवळ एक टेस्ट मेसेज आहे आणि नागरिकांनी घाबरण्याची किंवा कोणतीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. तरीही अचानक फोनमध्ये सायरनसारखा मोठा आवाज येऊन स्क्रीनवर इशारा दिसल्याने अनेक जण दचकले.

हा मेसेज सरकारच्या ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम’चा एक भाग आहे. भविष्यात भूकंप, पूर, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिकांना तात्काळ सूचना देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच वेळी लाखो मोबाईल फोनवर अलर्ट पाठवता येतो, अगदी नेटवर्क कमी असतानाही. त्यामुळे ही प्रणाली पारंपरिक एसएमएसपेक्षा अधिक वेगवान आणि प्रभावी मानली जाते.

देशभरात या प्रणालीची चाचणी घेण्यात आली असून अनेकांच्या मोबाईलवर इमरजन्सी अलर्ट किंवा एक्स्ट्रीमली सिव्हियर अशा स्वरूपाचे संदेश आले. यासोबतच मोठा अलार्म वाजल्याने लोकांचे लक्ष वेधले गेले.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर, विशेषत X (ट्विटर) आणि Instagram वर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला. अनेक युजर्सनी या अनुभवावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी लिहिले की, फोन असा ओरडला जणू जगच संपणार आहे तर काहींनी सरकारनेच सकाळी उठवले अशी गंमतीशीर प्रतिक्रिया दिली. एका युजरने मी अलार्म लावायला विसरलो होतो पण सरकारने उठवले असे म्हणत विनोद केला. तर दुसऱ्याने इतका मोठा आवाज आला की फोन फुटेल असे वाटले असे म्हटले.

काहींनी या अनुभवाची तुलना शाळेतील फायर ड्रिलशी केली तर काहींनी क्षणभर वाटले आपण युद्धात आहोत अशी प्रतिक्रिया दिली. एका युजरने तर मी हॉरर चित्रपट पाहत होतो आणि अचानक हा अलर्ट आला, अक्षरशः भीती वाटली असे लिहिले.

अनेकांनी सुरुवातीला घाबरून लगेच सोशल मीडियावर धाव घेतली आणि हा खरा इशारा आहे का याची खात्री करून घेतली. मात्र, माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा अनुभव हलक्याफुलक्या अंदाजात घेत मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली.

सरकारचा हा उपक्रम नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर सूचना मिळाव्यात, हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अलर्ट मिळाल्यास घाबरण्याची गरज नसून ते अनेकदा केवळ चाचणीचा भाग असू शकतात, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Follow Us
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची...
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची....
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज.
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार.....
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार......
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात....
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....