.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला माहितेय रेल्वेत टॉयलेटची सुविधा कशी आली? त्यामागे आहे एक मजेदार पत्रं

त्यांनी आपले म्हणणे एका पत्राद्वारे इंग्रजांपर्यंत पोहोचवले. ज्यामध्ये टॉयलेटला गेल्यामुळे ट्रेन कशी पकडता आली नाही हे त्याने सांगितलं.

तुम्हाला माहितेय रेल्वेत टॉयलेटची सुविधा कशी आली? त्यामागे आहे एक मजेदार पत्रं
railway toiletImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 07, 2023 | 5:59 PM
Share

रेल्वे प्रवास सोयीचा मानला जातो. शौचालय हे यामागील सर्वात मोठे कारण आहे. कल्पना करा ट्रेनमध्ये टॉयलेट नसेल तर तुम्ही त्यात प्रवास करू शकाल का? बहुतेक लोक म्हणतील – नाही, शौचालयांशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करणे अशक्य आहे, परंतु एक काळ असा होता की भारतीय रेल्वेने अशी कोणतीही सुविधा दिली नव्हती. त्यानंतर एकदा ओखिल चंद्र सेन नावाच्या प्रवाशाने याबाबत तक्रार करून विनंती केली. त्यानंतर रेल्वेनं या बाबतीत विचार करायला सुरुवात केली आणि मग ट्रेनमध्ये टॉयलेटची सुविधा आली.

1853 मध्ये ही रेल्वे भारतात सुरू करण्यात आली. 6 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे अशी पहिली प्रवासी गाडी चालवली गेली त्यावेळी या गाडीला फार खास सुविधा नव्हत्या.

ओखिल चंद्रा यांनी जुलै 1909 मध्ये पश्चिम बंगालच्या साहिबगंज रेल्वे विभागाला एक पत्र लिहून ट्रेनमध्ये शौचालये बसविण्याची विनंती केली. त्यानंतर भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये टॉयलेट बसवण्याचं काम केलं.

हे पत्र ओखिल चंद्र सेन नावाच्या प्रवाशाने लिहिले होते. त्यांनी आपले म्हणणे एका पत्राद्वारे इंग्रजांपर्यंत पोहोचवले. ज्यामध्ये टॉयलेटला गेल्यामुळे ट्रेन कशी पकडता आली नाही हे त्याने सांगितलं. या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की, भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये टॉयलेट बसवावेत.

Okhil Chandra Sen

Okhil Chandra Sen

ओखिल चंद्र सेन यांनी भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून म्हटले आहे की, प्रिय सर, मी अहमदाबादपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वेने आलो आणि याच दरम्यान माझ्या पोटात दुखू लागले आणि त्यामुळे माझे पोट सुजले. मी टॉयलेटला बसलो, पण त्याचवेळी ट्रेनच्या गार्डने शिट्टी वाजवली आणि ट्रेन सुरू झाली. ट्रेन पकडण्याच्या वेळी मी एका हातात लोटा आणि दुसऱ्या हातात धोतर धरून धावत होतो.

यामुळे मी प्लॅटफॉर्मवर पडलो आणि माझे धोतरही तिथेच उघडले. तिथे स्त्री-पुरुष होते, त्या सर्वांसमोर मला लाज वाटली आणि मी ट्रेन चुकलो. ट्रेन चुकल्यामुळे मी अहमदपूर रेल्वे स्टेशनवरच थांबलो.

हे किती चुकीचं आहे की कुणीतरी टॉयलेटमध्ये गेलंय आणि त्याच्यासाठी रेल्वेचा गार्ड थांबला नाही. मी तुम्हाला विनंती करतो की, त्या ट्रेनच्या गार्डला दंड आकारा अन्यथा मी हे वर्तमानपत्रात छापून आणीन. तुमचा सेवक, ओखिल चंद्र सेन.

Follow Us
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय