AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे असतो मुला-मुलींचा विचित्र मेळावा, पान खायला देताच ठरतं लग्न!

योग्य, मनासारखा जोडीदार शोधणे ही त्यात प्रामुख्याने येणारी गोष्ट. कधी जोडीदार ऑनलाइन शोधला जातो, कधी घरच्यांच्या ओळखीने घरचेच आपल्यासाठी जोडीदार शोधतात. ज्यांचं लग्न लवकर होत नाही ते मात्र या सगळ्याला कंटाळलेले असतात. लग्नाला घेऊन भारतात अशा अनेक प्रथा परंपरा आहेत.

इथे असतो मुला-मुलींचा विचित्र मेळावा, पान खायला देताच ठरतं लग्न!
marriage Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 18, 2023 | 3:07 PM
Share

पटना: आजकाल लग्न म्हटलं की अनेक गोष्टी येतात. योग्य, मनासारखा जोडीदार शोधणे ही त्यात प्रामुख्याने येणारी गोष्ट. कधी जोडीदार ऑनलाइन शोधला जातो, कधी घरच्यांच्या ओळखीने घरचेच आपल्यासाठी जोडीदार शोधतात. ज्यांचं लग्न लवकर होत नाही ते मात्र या सगळ्याला कंटाळलेले असतात. लग्नाला घेऊन भारतात अशा अनेक प्रथा परंपरा आहेत. एक परंपरा अशीच बिहार मध्ये आहे. देशभरात लग्नाबाबत एक विचित्र परंपरा पाळली जाते, पण तुम्हाला माहित आहे का की बिहारच्या पूर्णियामध्ये एक जत्रा आहे, जिथे मुलं आपल्या आवडीची मुलगी निवडू शकतात. या जत्रेला पट्टा मेळा म्हणून ओळखले जाते आणि इथे मुले आपल्या आवडीच्या मुलीला पान देऊन लग्नासाठी प्रपोज करतात.

दीडशे वर्षांहून अधिक जुनी परंपरा

बिहारमधील पूर्णिया मधील बनमनखी उपविभागातील मलियानिया दियारा गावात असलेल्या जत्रेचा इतिहास १५० वर्षांहून अधिक जुना आहे. अविवाहित मुला-मुलींना या पारंपारिक जत्रेत खूप रस असतो आणि बिहारव्यतिरिक्त पश्चिम बंगाल, झारखंड आणि नेपाळमधूनही लोक इथे येतात.

आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे

दरवर्षी एप्रिल महिन्यात भरणारा हा मेळावा प्रामुख्याने आदिवासींकडून आयोजित केला जातो. त्यापर्यंत पोहोचणाऱ्या मुला-मुलींना आपल्या आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य असते. जत्रेत येणारी मुलं आपल्या आवडीच्या मुलीला पान देऊन लग्नासाठी प्रपोज करतात आणि मुलगी पान खात असेल तर याचा अर्थ तीही त्या मुलावर प्रेम करते.

 जर मुलगी पान खात असेल तर…

जत्रेत मुलाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर मुलगी घरच्यांच्या संमतीने मुलासोबत जाते. यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत लवकरच आदिवासी रीतीरिवाजानुसार मुला-मुलीचे लग्न केले जाते. जत्रेच्या आयोजकांपैकी एक आणि माजी सरपंच म्हणतात की, जत्रेत येणाऱ्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर तिला प्रपोज करण्यासाठी तो पान खाण्याची ऑफर देतो. जर मुलगी पान खात असेल तर याचा अर्थ असा होतो की ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे आणि जर ती खात नसेल तर याचा अर्थ तिला त्या मुलाशी लग्न करायचे नाही.

लग्न ठरविल्यानंतर लग्नास नकार देणे दंडनीय

माजी सरपंच म्हणतात की त्यांनी आतापर्यंत आपल्या आयुष्यात अनेक अशा मुला-मुलींना पाहिले आहे ज्यांनी प्रेम व्यक्त करून लग्न गाठ बांधली आहे. लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांना एक अट मान्य करावी लागते आणि त्यानुसार आदिवासी परंपरेनुसार त्यांचे लग्न केले जाते. हे लग्न करताना निसर्गाला आपले आराध्य दैवत मानले जाते.जर जत्रेत आवडल्यानंतर कोणी लग्नास नकार दिला तर त्याला आदिवासी समाजाच्या कायद्यानुसार शिक्षा होते.

Follow Us
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी