AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर होस्टेसने सर्वच सांगितलं…, विमानातून प्रवासी उतरल्यानंतर आतमध्ये फ्लाइट अटेंडेंट काय करतात? ऐकून…

विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरल्यानंतर एअर होस्टेस आणि फ्लाइट अटेंडंट्स विमानामध्येच का थांबतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर.

एअर होस्टेसने सर्वच सांगितलं..., विमानातून प्रवासी उतरल्यानंतर आतमध्ये फ्लाइट अटेंडेंट काय करतात? ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 04, 2026 | 7:15 PM
Share

विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरलं की अनेकांना वाटतं एअर होस्टेस आणि फ्लाइट अटेंडंट्सची जबाबदारी तिथेच संपते. मात्र वास्तव यापेक्षा वेगळं आहे. प्रवासी विमानातून उतरल्यावरही एअर होस्टेसवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. ज्या पुढील उड्डाण सुरक्षित, सुरळीत आणि वेळेत होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

विमानातून शेवटचा प्रवासी बाहेर पडताच फ्लाइट अटेंडंट्सचं काम पुन्हा सुरू होतं. केबिनची तपासणी, सुरक्षिततेशी संबंधित बाबी पाहणे, प्रवाशांनी मागे सोडलेल्या वस्तू तपासणे आणि पुढील प्रवासासाठी विमान तयार ठेवणे ही सर्व कामं त्यांच्या ड्युटीचा अविभाज्य भाग आहेत.

उड्डाणानंतरही सुरू असते महत्त्वाची जबाबदारी

गोल्ड विंग्सच्या एका अहवालानुसार, तब्बल 10 वर्षे एव्हिएशन क्षेत्रात काम केलेल्या एका महिलेने जिने फ्लाइट अटेंडंटपासून केबिन मॅनेजरपर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. आपले अनुभव शेअर केले आहेत. तिच्या मते, एका साधारण उड्डाणानंतरही एअर होस्टेसची भूमिका संपत नाही तर ती अधिक जबाबदारीची होते.

विमान ठिकाणी पोहोचताच सर्वप्रथम एअर होस्टेस प्रवाशांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने विमानातून खाली उतरण्यास मदत करतात. त्यानंतर पुढील उड्डाणासाठी किती वेळ उपलब्ध आहे यावर त्यांची पुढील कामं अवलंबून असतात.

जर पुढील उड्डाणासाठी फक्त 30 मिनिटे किंवा त्याहूनही कमी वेळ उपलब्ध असेल तर अनेक वेळा एअर होस्टेस विमानातून बाहेरही पडत नाहीत. त्या थेट केबिनमध्येच थांबून पुढील प्रवासासाठी आवश्यक तयारी सुरू करतात. या वेळेत केबिन स्वच्छतेवर विशेष लक्ष दिलं जातं. अनेकदा सफाई कर्मचाऱ्यांना मदत करणं किंवा स्वच्छतेवर लक्ष ठेवणंही फ्लाइट अटेंडंट्सचंच काम असतं.

सुरक्षेपासून जेवणापर्यंत सर्व गोष्टींची तपासणी

विमान पुढील उड्डाणासाठी पूर्णपणे सज्ज आहे की नाही याची खात्री करणे ही एअर होस्टेसची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. केबिनमधील सुरक्षा उपकरणे योग्य ठिकाणी आहेत का, इमर्जन्सी उपकरणांची स्थिती, सीट बेल्ट, लाईफ जॅकेट्स यांची तपासणी केली जाते. याशिवाय, प्रवाशांसाठी दिलं जाणारं जेवण योग्य दर्जाचं आहे का, ते नियमानुसार लोड झालं आहे का, यावरही फ्लाइट अटेंडंट्स लक्ष ठेवतात.

या सर्व कामांसोबतच एअर होस्टेसना उड्डाणासंदर्भातील रिपोर्टही द्यावा लागतो. प्रवासादरम्यान घडलेल्या कोणत्याही विशेष घटना, प्रवाशांच्या तक्रारी, सुरक्षेशी संबंधित बाबी किंवा तांत्रिक निरीक्षणे यांचा उल्लेख या अहवालात केला जातो. हा अहवाल पुढील उड्डाणासाठी आणि एकूणच विमानसेवेच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरतो.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.