हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की ध्यानात ठेवा

Health Insurance | मेडिक्लेम बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजार आणि रोग. असे बरेच रोग आहेत, जे मेडिक्लेममध्ये समाविष्ट केले जात नाहीत. म्हणूनच, त्या रोगांबद्दल आपण आधीच नीट विचारून घेतले पाहिजे. त्यामुळे जर आपल्याला भविष्यात मेडिक्लेम पॉलिसी वापरण्याची आवश्यकता असेल, तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही. अशा परिस्थितीत, कोणकोणते रोग यात समाविष्ट आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की ध्यानात ठेवा
हेल्थ इन्शुरन्स
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 10:59 AM

मुंबई: कोरोना संकटानंतर कधी नव्हे ते आरोग्य क्षेत्राला अचानक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आजारपणाच्या काळात आरोग्य विमा किती फायदेशीर ठरू शकतो, ही बाब अनेकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आरोग्य विमा घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र, व्यवस्थित चौकशी न करता आरोग्य विमा घेतल्यास भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हेल्थ इन्शुरन्स बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजार आणि रोग. असे बरेच रोग आहेत, जे हेल्थ इन्शुरन्समध्ये समाविष्ट केले जात नाहीत. म्हणूनच, त्या रोगांबद्दल आपण आधीच नीट विचारून घेतले पाहिजे. त्यामुळे जर आपल्याला भविष्यात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी वापरण्याची आवश्यकता असेल, तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही. अशा परिस्थितीत, कोणकोणते रोग यात समाविष्ट आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

क्लेमची रक्कम

विमा पॉलिसीमध्ये गंभीर आजारासाठी क्लेमची रक्कम जास्त असावी. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक विमा कंपन्यांच्या धोरणांमध्ये, काही गंभीर आजारांवरील क्लेमची रक्कम तुलनेने कमी असते. विमा पॉलिसी घेण्यापूर्वी ग्राहकाला याची माहिती असावी. यासाठी ग्राहकाने गंभीर आजाराच्या कवर यादीसह सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत.

देय मर्यादा

रुग्णालयात भरतीसाठी लागणाऱ्या संपूर्ण विमा पॉलिसीची निवड करणे ग्राहकांसाठी नेहमीच चांगले असते. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक विमा कंपन्यांच्या पॉलिसींमध्ये पॉलिसीधारकास एका मर्यादेनंतर वॉर्ड किंवा आयसीयूचे बिल स्वत:लाच भरावे लागते. त्यामुळे पॉलिसी घेण्यापूर्वी ग्राहकाला याची माहिती असावी.

एकाच वेळी प्रीमियम भरल्यास सूट

बाजारात उपलब्ध असणार्‍या बर्‍याच विमा पॉलिसींना जास्तीत जास्त पॉलिसीच्या मुदतीत एकरकमी प्रीमियम भरण्यापासून सूट दिली जाते. पॉलिसीची मुदत जास्तीत जास्त तीन वर्षे असू शकते. प्रीमियम एकत्र जमा करुन ग्राहक या सूटचा लाभ घेऊ शकतात.

सध्याचा आजार कवर होणे

आरोग्य विमा घेताना सध्याच्या आजारासाठी विमा कवच आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. काही कंपन्या त्यांच्या पॉलिसीमध्ये विमाधारकाचा तत्कालीन आजारासाठी कवर देतात आणि काही देत नाहीत. ज्या ग्राहकांना सध्याच्या आजारासाठी कवर देतील आणि प्रतीक्षा कालावधी कमी असेल, अशा आरोग्य विम्याची निवड करावी.

को-पेमेंट क्लॉज

को-पेमेंट म्हणजे पॉलिसीधारकाने विमाधारक सेवांसाठी जे स्वतः पैसे द्यावे लागतात. ही रक्कम आधीच ठरलेले असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या बहुतेक विमा पॉलिसी को-पेमेंटच्या अटीसहच असतात. अशा परिस्थितीत ग्राहकाने विमा पॉलिसीची निवड केली पाहिजे ज्यामध्ये त्याला कमीत कमी को-पेमेंट द्यावे लागेल. या व्यतिरिक्त ग्राहक को-पेमेंटची अट काढून टाकण्याचा पर्याय देखील निवडू शकतात. यासाठी ग्राहकाला जादा प्रीमियम भरावा लागेल.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.