AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्ते अपघातात दर तासाला 18 जण गमावतात प्राण! सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूने उघड केले रस्ते अपघाताचे भयाण वास्तव

ओव्हर स्पीडिंग हे देशातील रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण आहे. 2021 मध्ये 59.7 टक्के अपघात हे अतिवेगाने झाले. त्यापैकी 87,050 लोकांचा मृत्यू झाला आणि 2.28 लाख लोक जखमी झाले.

रस्ते अपघातात दर तासाला 18 जण गमावतात प्राण! सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूने उघड केले रस्ते अपघाताचे भयाण वास्तव
रस्ते अपघात Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 05, 2022 | 9:14 PM
Share

मुंबई, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mitry) यांचे रविवारी  रस्ते अपघातात निधन झाले. या घटनेने देशातील रस्त्यांची दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे. जागतिक बँकेच्या मते, जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात (Road accident In India) होतात. कोरोना महामारीपूर्वी देशात दर चार मिनिटांनी एक भयानक रस्ता अपघात होत होता. जगभरातील वाहनांपैकी फक्त एक टक्का वाहने भारतात आहेत, मात्र जगातील एकूण रस्ते अपघातांपैकी एकूण  11 टक्के मृत्यू भारतात होतात (Accident rate) . जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्त्याचे  जाळे भारतात आहे. त्याची लांबी 58.9 लाख किमी आहे. मात्र निकृष्ट बांधकाम आणि  देखभालीच्या अभावामुळे बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

दर तासाला 18 जण गमावतात प्राण

अहमदाबाद-मुंबई रस्त्यावर दुभाजकाला धडकल्याने 54 वर्षीय मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला. मुंबई आणि अहमदाबाद या देशातील दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची ही अवस्था असताना देशाच्या इतर भागातील रस्त्यांची अवस्था काय असेल याचा सहज अंदाज येऊ शकतो. या घटनेने पुन्हा एकदा भारताचा रस्ता मोकळा झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी रस्त्यांचे महत्त्व यावरून समजू शकते की, देशाच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त मालाची वाहतूक रस्त्याने होते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी देशात रस्ते अपघातात 1.55 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. दररोज 426 म्हणजे दर तासाला 18 जण  रस्ते अपघातात आपले प्राण गमावतात.

अतिवेगाने सर्वाधिक मृत्यू

आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक रस्ते अपघात राष्ट्रीय महामार्गांवर होतात. रस्त्यांच्या दुरवस्थेबरोबरच बेदरकारपणे वाहन चालवणे हेही अपघातांचे प्रमुख कारण आहे. रस्त्यावर वाहन चालवण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड खूपच कमी आहे. आकडेवारीनुसार, ओव्हर स्पीडिंग हे देशातील रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण आहे. 2021 मध्ये 59.7 टक्के अपघात हे अतिवेगाने झाले. त्यापैकी 87,050 लोकांचा मृत्यू झाला आणि 2.28 लाख लोक जखमी झाले. गेल्या वर्षी देशात 4.03 लाख रस्ते अपघातात 3.71 लाख लोक जखमी झाले होते.

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दररोज 100 किमी रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. देशात दररोज 38 किमीचे रस्ते तयार होत असल्याचा सरकारचा दावा आहे, हा जगातील एक विक्रमच आहे. सरकारने रस्ते प्रकल्पांमध्ये 100% FDI ला परवानगी दिली आहे. देशातील मोठ्या प्रकल्पांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये भूसंपादन आणि टोल टॅक्सच्या विरोधातील आंदोलनांचा समावेश आहे. पावसाळ्यात देशातील महानगरांतील रस्त्यांची दुरवस्था होते. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडण्याची समस्या ही आता परिचयाची झाली आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!