AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Insurance : PF खात्यावर मिळतो मोफत विमा! पण तुम्ही केलं का हे काम

EPFO Insurance : पीएफ खातेदारांना मोफत विम्याचा लाभ मिळतो. हा विमा भरभक्कम आहे. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना मोठी आर्थिक मदत मिळते. वारसांची ससेहोलपट थांबते.

EPFO Insurance : PF खात्यावर मिळतो मोफत विमा! पण तुम्ही केलं का हे काम
| Updated on: Mar 19, 2023 | 8:24 PM
Share

नवी दिल्ली : भविष्यातील जोखीम टाळण्यासाठी, आपल्या पश्चात कुटुंबियांची ससेहोलपट थांबण्यासाठी आपण जीवन विमा पॉलिसी (Life Insurance) खरेदी करतो. तर गृह विमा, आरोग्य (Health), ट्रॅव्हल विमा काढता येतो. पण असा एक विमा आहे, जो तुम्हाला मोफत मिळतो. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना केंद्र सरकार हे विमा संरक्षण देते. नोकरदार वर्गाचे पीएफ खाते असते. त्यांना मोफत विमा मिळतो. इंप्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इंश्योरेंस स्कीम 1976 (EDLI) अंतर्गत हा विमा मिळतो. त्यासाठी पीएफ सदस्यांना कोणतेही शुल्क, हप्ता जमा करावा लागत नाही. ही योजना एकदम निःशुल्क आहे. पण त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तुम्हाला वारसदाराचे नाव पीएफ खात्यात जोडावे लागते. तरच या विम्याचा लाभ मिळतो.

ईपीएफओ हा विमा EDLI अंतर्गत देण्यात येतो. या योजनेतंर्गत सदस्याच्या वारसाला 2.5 लाख ते 7 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण मिळते. या योजनेतंर्गत जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. भविष्य कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्याचा (Members) अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना (Heirs) आर्थिक मदत देण्यात येते. 1976 पासून ही योजना लागू आहे. त्यामुळे संकटाच्या काळात या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार मिळतो.

काय आहे योजना

EPFO सदस्यांना विम्याची सुरक्षा असते. एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance Cover) अंतर्गत विमा मिळतो. या विमा योजनेत (Employees Deposit Linked Insurance) वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा मिळते. या योजनेसाठी सदस्याला कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. त्यासाठी तुमची कंपनी योगदान देते. त्यासाठी कर्मचाऱ्याला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.

कसा करावा दावा

जर कर्मचाऱ्यांचा, सदस्याचा अचानक, अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना विम्याचे संरक्षण मिळते. ते विम्यासाठी दावा दाखल करु शकतात. त्यासाठी वारसदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे. दावा दाखल करताना मृत्यू प्रमाणपत्र, वारसा हक्कासंबंधीचे कागदपत्रे सादर करावे लागतील.

EDLI योजनेतील महत्वाचे मुद्दे

  1. सदस्याच्या मृत्यूनंतर वारसदारांना जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
  2. 12 महिने नोकरी केलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना 2.5 लाख रुपयांचा लाभ मिळतो.
  3. EPFO सदस्याला EDLI योजनेत नोकरीत असेपर्यंतच फायदा मिळतो.
  4. सेवेत नसताना वारसदारांना विमा योजनेत दावा दाखल करता येत नाही.
  5. विम्याची रक्कम वारसदाराच्या बँक खात्यात थेट हस्तांतरीत करण्यात येते.

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी