AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेसाठी कसा अर्ज कराल? कसे मिळणार 15 हजार रुपये? जाणून घ्या

स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली. त्यामुळे विकसित भारत रोजगार योजना आहे तरी काय? कसा अर्ज करायचा? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या.

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेसाठी कसा अर्ज कराल? कसे मिळणार 15 हजार रुपये? जाणून घ्या
पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेसाठी कसा अर्ज कराल? कसे मिळणार 15 हजार रुपये? जाणून घ्याImage Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 15, 2025 | 5:40 PM
Share

स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 3.5 कोटी तरुणांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. विकसित भारत रोजगार योजनेच्या माध्यमातून तरुणांना मोठं गिफ्ट दिलं आहे. या योजनेतून खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा देशातील जवळपास 3.5 कोटी तरुणांना फायदा होणार आहे. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे आणि कोण अर्ज करू शकतो असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चला जाणून घेऊयात या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळेल आणि कसा ते…

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

विकसित भारत रोजगार योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2025 पासून 31 जुलै 2027 पर्यंत खासगी नोकरी करणाऱ्या तरुणांना मिळेल. ही योजना पार्ट ए आणि पार्ट बी अशा दोन भागात विभागली आहे. पार्ट ए अंतर्गत जे कर्मचारी पहिल्यांदा नोकरीत रूजू होतील आणि ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असतील त्यांच्यासाठी आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार दोन टप्प्यात 15000 रुपयांची रक्कम मिळेल. पण यासाठी देखील अट आहे.

पहिलं म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 1 लाखापर्यंत आहे. त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. यापेक्षा जास्त पगार असल्यांना हा लाभ मिळणार नाही. जर तुमचा पगार एक लाखापेक्षा कमी असेल तर पहिला हप्ता सहा महिने नोकरी केल्यानंतर मिळेल. तर दुसरा हप्ता 12 महिने नोकरी केल्यानंतर आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल.

पार्ट बी मध्ये नेमकं काय आहे?

या योजनेचा दुसरा भाग हा नोकरी देणाऱ्या कंपनीसाठी आहे. त्यामुळे या टप्प्याला पार्ट बी असं म्हंटलं आहे. या अंतर्गत कंपनीला लाभ मिळणार आहे. उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना सरकार प्रति कर्मचारी दरमहा 3 हजार रुपये अनुदान देईल. हे अनुदान दोन वर्षांसाठी सुरू राहील. जर कर्मचारी बराच काळ नोकरीवर राहिला तर ही मदत चौथ्या वर्षापर्यंत वाढवता येईल.

या योजनेसाठी अर्ज कसा कराल?

अर्जासाठी पहिल्यांदा श्रम सुविधा पोर्टलवर खातं उघडावं लागेल. यानंतर ईपीएफओ कोड प्राप्त करावा लागेल. ईपीएफओ एम्प्लॉयर लॉगिन पोर्टलवर नोंदणी करा. आता 1 लाख रुपये/महिना पगार असलेले नवीन कर्मचारी नियुक्त करा.पीएफ योगदानासह मासिक ईसीआर रिटर्न दाखल करा. कमीत कमी सहा महिन्यांसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करा. खरं तर या योजनेसाठी स्वत:हून काही अर्ज करण्याची गरज नाही. कारण नोकरी लागल्यानंतर आणि ईपीएफओमध्ये नोंदणी होताच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. पण वरील सर्व अटी पूर्ण असणं गरजेचं आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.