AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलआयसीचा ‘जीवन लाभ’: 260 रुपयांची गुंतवणूक, 20 लाखांचा परतावा!

एलआयसीच्या वेबसाईटवर एलआयसी जीवन लाभ पॉलिसीची (LIC Jeevan Labh Policy ) आकडेमोड देण्यात आली आहे. प्रतिदिन 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीवेळी 20 लाख रुपये मिळू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही दोन लाखांच्या विमा रकमेसाठी गुंतवणूक करू शकतात. मात्र, गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

एलआयसीचा ‘जीवन लाभ’: 260 रुपयांची गुंतवणूक, 20 लाखांचा परतावा!
Insurance Policy
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 9:02 PM
Share

नवी दिल्ली : कोविडच्या वाढत्या प्रकोपामुळे अर्थ जगतावर अस्थिरतेचं सावट आहे. सामान्य गुंतवणूकदारांत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित व सर्वोत्तम गुंतवणूक परतावा देणाऱ्या पर्यायाच्या शोधात गुंतवणूकदार आहेत. कमी हफ्त्यात अधिक परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांना आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) जीवन लाभ पॉलिसीचा पर्याय अधिक किफायतशीर ठरेल.

20 लाखांची मॅच्युरिटी

एलआयसीच्या वेबसाईटवर एलआयसी जीवन लाभ पॉलिसीची (LIC Jeevan Labh Policy ) आकडेमोड देण्यात आली आहे. प्रतिदिन 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीवेळी 20 लाख रुपये मिळू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही दोन लाखांच्या विमा रकमेसाठी गुंतवणूक करू शकतात. मात्र, गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या योजनेतील गुंतवणुकीवर कर सवलत देखील प्राप्त होते.

पॉलिसी कालावधी

पॉलिसी तीन कालावधीसाठी उपलब्ध आहे. 16 वर्ष, 21 वर्ष आणि 25 वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीसह स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतात. हफ्त्यांचा भरणा कालावधी 10 वर्ष, 15 वर्ष आणि 16 वर्ष इतका आहे. या स्कीमसाठी मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक हफ्त्यांच्या आधारावर गुंतवणूक केली जाऊ शकते.

गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये 08 ते 59 वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. तुम्ही मासिक स्वरुपात हफ्ता भरत असल्यास तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेत आणि तुम्ही सहामाही, वार्षिक स्वरुपात हफ्ता भरत असल्यास 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. गुंतवणूकदाराच्या मृत्यूच्या स्थितीत विमा रक्कम नॉमिनी व्यक्तीला अदा केली जाते.

योजनेचे फायदे

1. जीवन लाभ पॉलिसीअंतर्गत जर तुम्ही सलग 3 वर्षे प्रीमियम भरल्यास तुम्हाला कर्जाची सुविधा मिळू शकते

2. कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला पॉलिसी बंद करायची असल्यास तुम्ही तीन वर्षानंतर ती बंद करु शकता.

3. या पॉलिसीद्वारे तुम्हाला आयकरात कलम 80 सी अंतर्गत सूटही दिली जाते.

4. एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला अपघाती कव्हर दिला जातो. त्याशिवाय यात तुम्हा अन्य काही फायदेही मिळतात.

संबंधित बातम्या 

‘क्रिप्टो’ फर्म ईडीच्या रडारवर: कर नियमांसाठी केंद्राकडे धाव, अर्थसंकल्पात स्पष्टीकरणाची मागणी!

‘अनप्लग्ड’ टाटा: चरित्रातून जीवनपट लवकरच जगासमोर, पुस्तकासाठी महागडा लेखन करार!

IPO पूर्वीच LIC च्या कमाई मध्ये मोठी घसरण, डिसेंबर महिन्यामध्ये नवीन योजना विक्रीमध्ये तब्बल 20 टक्‍क्‍यांची पीछेहाट!

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.