Gold Bond | वर्षाकाठी सोन्यामध्ये 8 टक्क्यांचा परतावा, आज गुंतवणुकीची शेवटची संधी

Gold Bond | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23) सुरु केली आहे. योजनेचा हा दुसरा टप्पा आज बंद होत आहे.

Gold Bond | वर्षाकाठी सोन्यामध्ये 8 टक्क्यांचा परतावा, आज गुंतवणुकीची शेवटची संधी
डीआरआयकडून ऑपरेशन 'गोल्ड रश'Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 7:00 AM

Gold Bond | सोन्यातील गुंतवणूक आपल्याकडे सर्वाधिक सुरक्षित आणि फायद्याची मानण्यात येते. चीननंतर भारतीय सोन्यात सर्वाधिक गुंतवणूक करतात. भारत सरकारनेही गुंतवणुकीसाठी खास ऑफर आणली आहे. आज तुम्हाला सरकारच्या सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23)आणली आहे. गोल्ड बाँडच्या विक्रीचा हा दुसरा टप्पा आहे. आयएनआरच्या (INR) माहितीप्रमाणे आतापर्यंत सोन्यामध्ये गुंतवणूकदारांना दर वर्षाकाठी सुमारे 8 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. परिणामी सोन्यातील गुंतवणुकीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) सातत्याने चढ उतार होत असते. या योजनेची दुसरी मालिका 22 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. 26 ऑगस्ट म्हणजे आज सोने खरेदी करता येणार आहे.

सुवर्ण रोख्यांत मोठी गुंतवणूक

भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप्पं आहे.

हे सुद्धा वाचा

गोल्ड बॉण्ड योजना काय आहे?

सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23)आणली आहे. सरकारने 5 नोव्हेंबर 2015 पासून सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजना सुरु केली. गोल्ड बॉण्ड्स सरकारच्यावतीने RBI जारी करते. आतापर्यंत आरबीआयने गोल्ड बॉण्ड्सचे आठ टप्पे आले आहेत. या गोल्ड बॉण्ड्सची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीवर आधारित असते.

एक ग्रॅमसाठी मोजा 5,197 रुपये

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने 5,197 रुपये प्रति ग्रॅम दर जाहीर केला आहे. गुंतवणूकदार अगदी एक ग्रॅम सोने खरेदी करुन या योजनेत सहभागी होऊ शकतो.

लगेचच 500 रुपयांचा नफा

सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या आणि पैसे भरणार्‍या गुंतवणूकदारांना इश्यू किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट दिली जाईल. म्हणजेच 10 ग्रॅम खरेदी केल्यास 500 रुपयांचा त्वरीत फायदा होईल. गुंतवणूकदारांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल.

1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंत सोने खरेदी

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास ते 5 व्या वर्षानंतर या योजनेतून बाहेर पडू शकतात.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.