AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता ईएमआय चुकला तरी बॅंकांना व्याजासह दंड लावता येणार नाही, काय आहे आरबीआयचा नवा निर्णय

रिझर्व्ह बॅंकेने योग्य कर्ज व्यवहार -कर्ज खात्यांवर दंडात्मक शुल्काबाबत शुक्रवारी अधिसूचना जारी केली आहे.

आता ईएमआय चुकला तरी बॅंकांना व्याजासह दंड लावता येणार नाही, काय आहे आरबीआयचा नवा निर्णय
cashImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 18, 2023 | 4:14 PM
Share

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : आता तुमचे कर्जाचे हप्ते चुकले तरी तुम्हाला फारसी चिंता करण्याची गरज नाही. कारण यापुढे आपले कर्जाचे हप्ते चुकले तर बॅंकांना भरसाठ व्याजासह दंड आकारता येणार नाही. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ( RBI आरबीआय ) अशा प्रकारे ग्राहकांकडून वसुल केल्या जाणाऱ्या दंडात्मक व्याजावर चिंता व्यक्त केली आहे. बॅंका आणि गैर बॅंकींग वित्तीय कंपन्यांनी आपला महसूल वाढविण्यासाठी याचा वापर केल्याने आरबीआयने आता नवीन सुधारित नियम जारी केला आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की, दंडात्मक व्याज आकारण्यामागाचा हेतू लोन वेळेत फेडण्याबाबत ग्राहकांमध्ये शिस्त आणणे हा असतो. त्याचा वापर बॅंकांनी आपला महसूल वाढविण्यासाठी करु नये.

काय आहेत नवीन नियम

– नवीन नियम कर्ज फेडण्यात आलेल्या त्रूटीबाबत असतील

– आता बॅंका संबंधित ग्राहकांवर योग्य दंडात्मक शुल्क लावू शकतात

– बॅंकांना आता दंडात्मक व्याज आकारता येणार नाही

– हा नवा नियम जानेवारी 2024 पासून लागू होणार

– दंडात्मक शुल्काचे गुंतवणूक किंवा भांडवल म्हणून वापर करता येणार नाही

– या शुल्क आकारणीवर अतिरिक्त व्याज आकारले जाणार नाही.

हे आदेश या बाबीला लागू नाहीत

रिझर्व्ह बॅंकेने योग्य कर्ज व्यवहार -कर्ज खात्यांवर दंडात्मक शुल्काबाबत शुक्रवारी अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना बॅंकांना तसेच अन्य कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था पाठविण्यात आली आहे. आता बॅंका दंडात्मक व्याजाला आगाऊ आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांमध्ये जोडले जाते. रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे की दंडात्मक शुल्क योग्य हवे, ते उत्पादन श्रेणीत पक्षपाती व्हायला नको. आरबीआयचे हे नवे आदेश क्रेडीट कार्ड, बाह्य वाणिज्यिक कर्ज, व्यापार क्रेडीट आदीवर लागू होणार नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.