AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Journey : रेल्वे सुटली, पुढच्या स्टेशनवर गाठली, पण तुमची जागा मिळाली दुसऱ्याला, आता काय करणार?

Railway Journey : तुमची ट्रेन सूटली तर काय काय होऊ शकते, मिळू शकतो का दिलासा

Railway Journey : रेल्वे सुटली, पुढच्या स्टेशनवर गाठली, पण तुमची जागा मिळाली दुसऱ्याला, आता काय करणार?
| Updated on: Jan 19, 2023 | 9:43 PM
Share

नवी दिल्ली : भारतातील कोट्यवधी प्रवासी दररोज भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात. कामासाठी, नातेवाईकांना भेटण्यासाठी, कार्यालयीन कामासाठी, परीक्षा वा इतर अनेक कामांसाठी रेल्वेचा प्रवास करण्यात येतो. हा प्रवास स्वस्त असतो, त्यासाठी खड्यांचा प्रवास करण्याची गरज नाही. प्रवास फार वळणाचा वा कंटाळवाणा नसतो. त्यामुळे रेल्वेचा प्रवास (Railway Journey) हा अनेकांच्या आवडीचा असतो. प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक माहिती असते. अनेकदा प्रवाशी रेल्वे स्टेशनवर येतात. पण रेल्वे वेळेवर पोहचत नाही, असे चित्र आहे. पण एखाद्यावेळी असा विचार करत, थोडा उशीर झाला तर रेल्वे हातातून निसटते (Miss the Train) आणि इच्छितस्थळी पोहचण्याची कसरत करावी लागते. अशावेळी काय काय करता येते.

तुम्ही वेळेवर पोहचू न शकल्याने ट्रेन मिस झाल्यास, तुम्हाला पुढील स्टेशनवर ती पकडता येईल. पण तुम्ही वेळेवर निर्धारीत स्थळी हजर नसाल आणि रेल्वे सुरु झाल्यास टीटीईला (TTE) तुमची सीट दुसऱ्या प्रवाशाला देता येते. हा त्याचा अधिकार असतो.

पण तुम्ही धावत जाऊन कमी अंतरावरील स्टेशन जवळ केले तर तुम्ही तुमच्या आरक्षित जागेवर दावा करु शकता. रेल्वे आरक्षित तिकीटावर पुढील 2 रेल्वे स्टेशनपर्यंत हे आरक्षण कायम ठेवते. त्यानंतर टीटीई तुमची सीट इतर प्रवाशाला देऊ शकतो.

या नियमाचा एक फायदा आहे. या नियमामुळे तुमच्या स्टेशनपासून पुढील दोन स्टेशन पर्यंत आरक्षणाचा दावा कायम राहतो. त्यामुळे तुम्हाला रेल्वे गाठून सीटवर दावा करता येतो. तुम्हाला स्टेशन चुकण्याची शक्यता वाटत असेल तर अगोदरच पुढील स्टेशनचा प्रवास सुरु करा आणि लवकर ते स्टेशन गाठा. याठिकाणी ट्रेन पकडता येईल.

एवढे करुनही ट्रेन सुटलीच तर तुम्हाला तिकीटाच्या अर्ध्या रक्कमेवर दावा करता येतो. ही प्रक्रिया तुम्हाला ट्रेन सुटल्याच्या तीन तासांत पूर्ण करावी लागते. ट्रेन सुटू नये यासाठी तुम्हाला वेळेचे नियोजन करावे लागेल. नाहीतर हे नियम मदतीला धावून येतील.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय