AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Depositors | बँक बुडाली, मग किती मिळणार नुकसान भरपाई..काय आहे नियम..

Depositors | जर एखाद्या बँकेचे दिवाळं निघालं, ती दिवाळखोरीत गेली तर खातेदाराला किती रक्कम मिळते?

Depositors | बँक बुडाली, मग किती मिळणार नुकसान भरपाई..काय आहे नियम..
तर मिळतील एवढे पैसेImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 22, 2022 | 7:19 PM
Share

नवी दिल्ली : जर एखाद्या बँकेचे दिवाळं निघालं, ती दिवाळखोरीत गेली. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) बँकिंग परवाना (Banking License) रद्द केला तर खातेदाराला किती रक्कम मिळते?

आरबीआय बँकांसाठी नियम जाहीर करते. एखाद्या बँकेत अनियमितता आढळल्यास अशा बँकांना दंड लावते. बँकेच्या ताळेबंदात (Balance Sheet)मोठा फरक आढळल्यास ग्राहकहितासाठी अशा बँका बंद करण्यात येतात.

आरबीआयच्या कारवाईनंतर देशातील अनेक बँकांना कायमचं टाळं लागले आहे. आरबीआयने महाराष्ट्रातील रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार, आज ही बँक बंद झाली.

या बँकेच्या ठेवीदारांना, खातेदारांना आता 5 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम मिळते. ग्राहकांना त्यासाठी डिपॉझिट इन्शरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन  कायद्यातंर्गत (DICJC Act 1961) पुढील कारवाई करावी लागते.

तुमचे जर एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये खाते असेल तर सर्व खात्यांमधील ठेव मोजली जाईल. त्यावरील व्याज मोजल्या जाईल. केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची मदत तुम्हाला केली जाईल.

दोन वेगवेगळ्या बँकेत तुमची खाती असतील आणि दोन्ही बँका दिवाळखोरीत गेल्यास दोन्ही खात्याचा 5-5 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरविला जाईल. त्याआधारे तुम्हाला मदत करण्यात येईल.

पूर्वी खातेदारांना फार मोठा आर्थिक फटका बसत होता. काबाडकष्ट करुन तो बँकेत ठेवी ठेवी आणि बँक बुडाली तर त्याला केवळ एक लाख रुपये विम्यापोटी मिळत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा नियम बदलला.

2021 मध्ये डिपॉझिट इन्शरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायद्यात(DICGC) सुधारणा करण्यात आली. एक लाख रुपये विम्याची मर्यादा हटवून ती 5 लाख रुपये करण्यात आली.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.