AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI : रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय तुम्हाला पडणार महागात..ऐन सणासुदीत खिश्यावर येणार ताण..

RBI : RBI येत्या आठवड्यात पुन्हा एक मोठा निर्णय घेणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्यावर पुन्हा बोजा पडण्याची भीती आहे.

RBI : रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय तुम्हाला पडणार महागात..ऐन सणासुदीत खिश्यावर येणार ताण..
खिश्यावर पडणार भारImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 25, 2022 | 6:00 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) महागाई (Inflation) आटोक्यात आणण्यासाठी उपाय करणारा असली तरी त्यामुळे तुमच्या खिश्यावर भार पडणार आहे. तुम्हाला महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहे. जगभरातील अनेक केद्रीय बँकांनी महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर (Interest Rate) वाढवले आहेत.

RBI महागाईला चित्त करण्यासाठी रणनीती आखत आहे. केंद्रीय बँक लवकरच रेपो दरात वाढ करणार आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने आणि इतर केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवले. त्यानंतर आरबीआय ही व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक येत्या शुक्रवारी सलग चौथी व्याज दर वाढ करण्याची दाट शक्यता आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने आतापर्यंत रेपो दरात 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता पुन्हा व्याजदर वृद्धीने जनता हैराण होणार आहे.

रेपो दर चार टक्क्यांहून वाढून आता 5.40 टक्क्यांवर पोहचला आहे. पतधोरण समितीची (MPC) 30 सप्टेंबर रोजी बैठक होण्याची शक्यता असून रेपो दरात 0.50 टक्क्यांची वृद्धी अपेक्षित आहे. असा निर्णय झाल्यास रेपो दर 5.90 टक्के होईल. त्यामुळे कर्ज पुन्हा महाग होईल आणि कर्जावरील ईएमआयमध्ये सुद्धा वाढ होईल.

रेपो दरात मे महिन्यात 0.40 टक्क्यांची वृद्धी झाली होती. तर जून आणि ऑगस्ट महिन्यात रेपो दरात 0.50-0.50 टक्क्यांची वाढ झाली. ग्राहक मूल्य सूचकांकवर आधारीत किरकोळ महागाई दर ऑगस्ट महिन्यात सात टक्क्यांवर पोहचला आहे. पतधोरण समिती या किरकोळ महागाई दरावर लक्ष ठेऊन असते.

आरबीआय गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक बुधवारपासून सुरु होत आहे. रेपो दराबाबत येत्या शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी निर्णय होईल. रेपो दरात किती वाढ होईल याची माहिती मिळेल. जर रेपो दरात जास्त वाढ झाली नाही तर महागाई आटोक्यात येण्याचा विश्वास आरबीआयला आहे, असे स्पष्ट होईल.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.