AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येथे उघडले सायंकालीन पोस्ट ऑफीस

पोस्ट कार्यालयाचे कामकाज टीपिकल सरकारी पद्धतीने चालत असते. दुपारी साडे तीन वाजताच बंद होणाऱ्या या सरकारी उपक्रमाने आता कात टाकली असून सायंकाळी कामकाज चालणारे अनोखे पोस्ट ऑफीस उघडण्यात आले आहे.

येथे उघडले सायंकालीन पोस्ट ऑफीस
eveningpostImage Credit source: eveningpost
| Updated on: Jan 18, 2023 | 2:43 PM
Share

बंगळूरू : कोणत्याही सरकारी कार्यालयाचे कामकाज सायंकाळी संपते. त्यामुळे नागरीकांना सायंकाळी पाचनंतर कोणतीही सरकारी कार्यालयाची सेवा मिळत नाही. त्यात जर रात्री उशीरापर्यंत सेवा देणाऱ्या पोस्ट कार्यालयाची सोय असेल तर किती मजा येईल ना ! हो हे खरे आहे, आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरात देशातील पहिले सायंकालीन पोस्ट ऑफीस सुरू करण्यात आले आहे. काय आहे ही योजना, हे पोस्ट कार्यालय कोणत्या सेवा देणार आहे. याची माहिती जाणूया …

बंगळूरु शहरात सोमवारी देशातील पहील्या सायंकालीन पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन केले गेले. या पोस्ट कार्यालयात स्पीड पोस्ट ते आधार सुविधा केंद्राची सुविधा मिळणार आहे. हे अनोखे कार्यालय आठवड्यातून सहा दिवस दुपारी एक ते रात्री ९ वाजेपर्यंत सेवा देणार आहे. या पोस्ट कार्यालयात नागरिकांना स्पीड पोस्ट, पार्सल बुकींग, पार्सल पॅकींग, आधार केंद्र सेवा, पिक्चर पोस्ट कार्ड आणि स्टँप आदी सेवा मिळणार आहेत.

ही सायंकालीन पोस्ट कार्यालयाची संकल्पना नोकरीमुळे आपली पोस्टविषयक कामे करता न येणाऱ्यांसाठी अस्तित्वात आली आहे. सर्व सामान्य पोस्ट कार्यालयाची काऊंटर दुपारी साडे तीनलाच बंद होत असतात. परंतू सायंकालीन पोस्ट कार्यालय ही अत्यंत आर्कषक संकल्पना असून ती कामकाज करणाऱ्या नोकरपेशा व्यक्तींसाठी तसेच ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे पोस्टल असिस्टंट विनय श्रेयस यांनी सांगितले.

नोकरी पेशा वर्गासाठी अधिकाधिक सायंकालीन पोस्ट कार्यालये उघडण्याची योजना असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. कर्नाटकात धारवाड येथे आधी गेल्यावर्षी नोव्हेंबरात अशा उपक्रमास यश आल्याने हा प्रयोग बंगळूरात राबविण्यात आला आहे. तीन लाख रूपयांत या कार्यालयाचे सुशोभिकरण केले असून पोस्ट कार्यालयाच्या इतिहास ही थीम वापरून या पोस्ट कार्यलयाची निर्मिती केली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.