AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Insurance : सोनेरी भविष्य सोडा, तोट्यात नेईल हा Insurance चा सौदा! जाणून घ्या गुंतवणुकीचा योग्य पर्याय

Insurance : विमा आणि गुंतवणुकीचा गोंधळ अनेकांना कळत नाही. त्यामुळे भविष्यातील आरामदायी आयुष्याच्या स्वप्नांना मोठा सुरुंग लागतो. तर यातील पुसट रेष जर तुम्ही ओळखली तर मोठ्या नुकसानीपासून तुम्ही वाचू शकता...

Insurance : सोनेरी भविष्य सोडा, तोट्यात नेईल हा Insurance चा सौदा! जाणून घ्या गुंतवणुकीचा योग्य पर्याय
| Updated on: May 19, 2023 | 11:25 AM
Share

नवी दिल्ली : विमा (Insurance) आणि गुंतवणुकीचा गोंधळ अनेकांना कळत नाही. त्यामुळे भविष्यातील आरामदायी आयुष्याच्या स्वप्नांना मोठा सुरुंग लागतो. अनेक जण विमा कंपन्यांच्या फसव्या जाहिरातीला भुलतात. विमा आणि गुंतवणुकीचा प्लॅन एकत्रच खरेदी करतात. त्यातून भविष्यात त्यांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ मिळू शकतो. मात्र गुंतवणुकीतून (Investment) हवा तसा फायदा मिळत नाही. त्यामुळे गुंतवणूक आणि विमा या दोन भिन्न बाबी आहेत, हे समजून घेतले पाहिजे. ही पुसट रेष जर तुम्ही ओळखली तर मोठ्या नुकसानीपासून तुम्ही वाचू शकता…

तर असा होतो तोटा एखाद्या विमा कंपनीच्या विमा पॉलिसीचं एक उदाहरण पाहू. यामध्ये कंपनीने 2 लाख रुपयांची विमा पॉलिसी विक्री केली. त्यात वार्षिक प्रीमियम जवळपास 12 हजार रुपये ठरला. विमाधारकाला 20 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर 5 लाख रुपयांचा फायदा होणार होता. तसेच त्याला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार होते. विमाधारकाला हा फायद्याचा सौदा वाटत असला तरी, यातील गोम अनेकांना कळत नाही. त्याचे विमा संरक्षण अवघे पाच लाख आणि 20 वर्षांनंतरचा फायदाही पाच लाख रुपयेच म्हणजे अत्यंत कमी आहे.

कम्पाऊंडिंगचे शास्त्र आता अनेक कंपन्या टर्म इन्शुरन्स देतात. वार्षिक प्रीमिअम पम कमी असतो. त्यात तुम्ही तरुणपणीच टर्म इन्शुरन्स काढला तर सर्वाधिक फायदा होतो. हप्ता ही कमी येतो. त्यासोबतच आरोग्य विमा काढल्यास, त्याचा फायदा मिळतो. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक तक्रारीचा निपटारा तर होतोच आणि खिशाला मोठी झळ बसत नाही. तसेच एफडी पेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास त्याचा मोठा फायदा होतो. दर महिन्याला 4 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास आणि त्यात दरवर्षी 10% टक्क्यांची वाढ केल्यास तुम्हाला मोठा फायदा होतो. या सूत्राने दीर्घकालावधीनंतर तुम्हाला 33 लाख रुपये मिळतात. हे कम्पाऊंडिंगचे शास्त्र आहे, ते समजून घ्या.

सातत्याचा फायदा दरमहा एसआयपीच्या (SIP) माध्यमातून म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक केली तर करोडपती होता येते. त्यासाठी नियमीत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक केल्यास वर्षाला 12 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. ही गुंतवणूक सातत्याने 20 वर्षे सुरु ठेवली तर एकूण 2,40,000 रुपये गुंतवणूक होईल. त्यावर 12 टक्के व्याज दर गृहित धरला तर त्यावर 7,59,148 रुपयांचे व्याज मिळेल. पुढील 20 वर्षांत एकूण 9,99,148 रुपये म्हणजेच 10 लाख रुपये मिळतील.

या म्युच्युअल फंडाने 14 टक्के दराने परतावा दिला तर म्यॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला 13,16,346 रुपये मिळतील. 15 टक्क्यांच्या हिशोबाने म्यॅच्युरिटीवर 15,15,955 रुपये मिळतील. SIP च्या माध्यमातून 1000 रुपयांची मासिक गुंतवणूक करुन तुम्ही 20 वर्षांत कमीत कमी 10 लाख अथवा त्यापेक्षा अधिकचा परतावा मिळू शकता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.