AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway : पिवळ्या पाटीवरच कशासाठी स्टेशनच्या नावाची कलाकुसर! इतर रंगाची का आहे रेल्वेला ॲलर्जी

Indian Railway : तुम्ही प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्याच्या नावाची पाटी पाहिली असेलच. ती कायम पिवळ्या रंगाची आणि त्यावर काळ्या रंगाने स्टेशनचे नाव लिहिलेले दिसते. पण मग इतर रंगाचा वापर का बरं नसतील करत..

Indian Railway : पिवळ्या पाटीवरच कशासाठी स्टेशनच्या नावाची कलाकुसर! इतर रंगाची का आहे रेल्वेला ॲलर्जी
| Updated on: May 13, 2023 | 9:02 PM
Share

नवी दिल्ली : देशात आजघडीला हजारो रेल्वे स्टेशन (Railway Station) आहेत. पण सर्व रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरात  गिरवलेली असतात. प्रत्येक रेल्वे स्टेशनवर हाच कॉमन फॉर्म्युला दिसून येतो. या दोन रंगा व्यतिरिक्त इतर दुसरा रंग वापरत नाहीत. यामागचं लॉजिक काय असेल बरं, इतर रंगाची रेल्वे खात्याला ॲलर्जी तर नाही ना, का हे दोन रंग वापरण्यामागे खास वैज्ञानिक कारण आहे, असे प्रश्न तुमच्या पण मनात दंगा करत असतील. रेल्वे स्टेशनवरील इतर दिशा निर्देशही पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरात (Railway Station Name Board)लिहण्यात येतात. यामागील कारणं तुम्हाला माहिती आहे का? ही काही अंधश्रद्धा नाही तर त्यामागे विज्ञान आहे.

जगातील मोठं नेटवर्क भारतीय रेल्वेतून तुम्ही कधी ना कधी प्रवास केलाच असेल. देशात जवळपास 7 हजारहून अधिक रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकातून 20 हजारांपेक्षा अधिक रेल्वे निघतात. रोज लाखो प्रवाशी रेल्वेतून प्रवास करतात. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी हा एक आहे. पण या सर्व रेल्वे स्टेशनवरील नेम बोर्ड कायम पिवळ्या रंगाचे असते. निळ्या, लाल अथवा हिरव्या रंगाचे नसते. यामागे एक कारण आहे.

हे आहे कारण देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचे (Railway Station) नाव पिवळ्या रंगावर काळ्या अक्षरात लिहिण्यात येतात. कारण पिवळा रंग तुम्हाला दूरनही आकर्षित करतो. त्यामुळे लोको पायलटला रेल्वे स्टेशन येण्यापूर्वीच हा बोर्ड दिसतो. तसेच दिवस आणि रात्री दोन्ही वेळा चमकदार पिवळा रंग स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे चालकाला स्टेशनचे नाव दूरनच दिसते आणि त्याला थांबण्याचे सिग्नल मिळते.

डोळ्यांना फायदा तसेच पिवळा रंग डोळ्यांना सुखावणारा असतो. तो डोळ्यांना त्रासदायक नसल्याचे मत आहे. त्यामुळे अंत्यत गर्दीच्या स्थानकावरही हा साईन बोर्ड तुम्हाला दिलासा देतो. तसेच हा बोर्ड लोको पायलटला जागरुक करतो. लोको पायलट प्लॅटफॉर्म थांबायचे नसेल तरी तो हॉर्न वाजवून लोकांना जागरुक करतो.

दूरुनच ओळखता येते पिवळ्या बोर्डावर काळ्या रंगातच रेल्वे स्थानकाचे नाव लिहिण्यात येते. तसेच इतर निर्देश आणि फलकही पिवळ्या रंगाची असतात. त्यावर काळ्या अक्षरात ही माहिती लिहिण्यात येते. त्यामुळे ही अक्षरे दूरुन दिसून येतात. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे चालकाला सूचना आणि स्थानकाचे नाव स्पष्टपणे लक्षात येते.

अनेकांना वाटत असेल की लाल रंग तर अत्यंत भडक आणि लक्षणीय असतो. तो का नाही वापरत? रेल्वे स्टेशनची नावे लाल रंगाच्या पाटीवर का लिहिण्यात येत नाही. लाल रंग हा धोक्याची निशाणी म्हणून वापरल्या जातो. त्यामुळे या रंगाचा वापर करण्यात येत नाही.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.