Sahar Shaikh | कैसा हराया… म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकी भानगड काय?
ठाणे महापालिका निवडणुकीत 'कैसा हराया' म्हणत चर्चेत आलेल्या एआयएमआयएम (AIMIM) च्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात आलं आहे, नेमकं काय घडलं जाणून घ्या...
ठाणे महापालिका निवडणुकीत ‘कैसा हराया’ म्हणत चर्चेत आलेल्या एआयएमआयएम (AIMIM) च्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा अहवाल ठाणे तहसीलदारांनी दिला आहे. बनावट जात प्रमाणपत्र सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार तक्रारदार जावेद सिद्दीकी यांच्या पाठपुराव्यानंतर, सहर शेख यांचे वडील युनूस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी असून, महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतरही त्यांनी चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
पुढील तपासानंतर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सहर शेख या अपात्र ठरून त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल

