AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं विधान, काय म्हणाल्या?

आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि… अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं विधान, काय म्हणाल्या?

| Updated on: Sep 10, 2026 | 12:55 PM
Share

अमृता फडणवीस यांनी स्वतःला सर्वाधिक ट्रोल होणारी मंत्र्याची पत्नी अशी उपाधी मिळाल्याचे मिश्किलपणे सांगितले. लव्ह जिहादसारख्या प्रकरणांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता असून, मुलींना धर्मशिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नको या मागणीवर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत होत असल्याचेही त्या म्हणाल्या.

राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी नुकतेच पत्रकारांच्या प्रश्नांना मिश्किलपणे उत्तर दिले. “सर्वाधिक ट्रोल होणारी मंत्र्याची पत्नी, अशी मला उपाधी दिली आहे,” असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी काही महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्द्यांवरही आपली भूमिका मांडली. लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना, अमृता फडणवीस यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. “आपल्याला लव्ह जिहादवर दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार करावा लागेल आणि कायदे अधिक कठोर करावे लागतील,” असे त्या म्हणाल्या. आपल्या मुलींना स्वतःच्या धर्माविषयी ज्ञान, विश्वास आणि अभिमान असावा, यासाठी वेद, पुराणे, गीता आणि महाभारतासारख्या ग्रंथांचे शिक्षण देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यामुळे अशा प्रकरणांचे प्रमाण हळूहळू कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गरबा आयोजनात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवरही त्यांनी आपले मत मांडले. या भूमिकेचे काही लोकांनी स्वागत केल्याचे त्यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नव-हिंदुत्ववादी मंत्र्यांना समुपदेशन करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. अमृता फडणवीस यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

Published on: Sep 10, 2026 12:55 PM

Follow Us