AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : मुंबईकरांसाठी ठाकरे कुटुंबीयांनी काय दिवे लावले? ते कुटुंब महाराष्ट्रातलं.... नितेश राणेंचा प्रहार

Nitesh Rane : मुंबईकरांसाठी ठाकरे कुटुंबीयांनी काय दिवे लावले? ते कुटुंब महाराष्ट्रातलं…. नितेश राणेंचा प्रहार

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Jan 09, 2026 | 8:16 PM
Share

नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबाच्या महाराष्ट्रातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहादाला मत असे म्हणत त्यांनी मुंबईसाठी ठाकरे कुटुंबाच्या योगदानावर टीका केली. मुंबईत हिरवंकरण आणि सर तन से जुदाच्या घोषणांचा संदर्भ देत, आगामी निवडणुकीत जनता हिंदुत्वाच्या विचाराने मतदान करेल असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.

भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबाच्या महाराष्ट्रातील अस्तित्वावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रात तरी आहे का? असा सवाल करत, मुंबईसाठी त्यांनी काय दिवे लावले असाही त्यांनी उपरोधिक प्रश्न विचारला. आम्ही मुळापर्यंत पोहोचायचं का? मूळ बाहेर काढायचं का? मग आम्हालाही तोंड बाहेर उघडायला लागेल, असा इशाराही राणे यांनी दिला. नितेश राणे यांच्या मते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी विशेष काही केले नाही. उलट, बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढवली, तसेच मुंबईचे हिरवं हिरवंकरण केले, असा आरोप त्यांनी केला.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनी हिरवा गुलाल उधळत सर तन से जुदा आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याचा संदर्भ देत, मुंबईची जनता हे विसरलेली नाही असे राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंना दिलेले मत म्हणजे जिहादाला मत आणि काँग्रेसला दिलेले मत म्हणजे मुस्लिम लीगला मत असे स्पष्ट मत राणे यांनी मांडले. येत्या 15 तारखेला मुंबईची जनता आणि 29 महापालिकेची जनता हिंदुत्वाचा विचार नजरेसमोर ठेवून मतदान करेल आणि 16 तारखेला सगळं भगवमय होईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Published on: Jan 09, 2026 08:16 PM

Follow Us
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..