महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ‘त्या’ ट्विटवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
Chandrashekhar Bawankule on Anjali Damania Tweet : त्या ट्विटमुळे राज्यात सत्तांतराची चर्चा, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर : राज्यात पुन्हा सत्तांतर होणार का? अशी शंका उपस्थित करणारं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. या ट्वीटवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंजलाी दमनिया यांनी केलेल्या ट्विटला काहीही अर्थ नाही. यावर टिप्पणी केल्यास सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्यासारखं आहे. त्यामुळे मी त्यावर फारसं काही बोलणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा मिळेल असं बोललं जात असेल तर त्याला अर्थ नाही. कोर्टाचा निकाल येईल तेव्हा येईल. मात्र सध्या शिवसेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आहे आणि हेच जनतेचं मत आहे हाच जनतेचा कौल आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

