AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse : पुरावे देऊनही निवडणुका घेताय? नक्कीच दबावाखाली निवडणूक आयोग!  मतदार यादीतील घोळांवरून खडसेंचा सवाल

Eknath Khadse : पुरावे देऊनही निवडणुका घेताय? नक्कीच दबावाखाली निवडणूक आयोग! मतदार यादीतील घोळांवरून खडसेंचा सवाल

| Updated on: Nov 04, 2025 | 2:33 PM
Share

एकनाथ खडसे यांनी मतदार यादीतील घोळ आणि दुबार नावांवरून राज्य निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यादी सुधारल्याशिवाय निवडणुका घेणे अयोग्य असून, पुरावे देऊनही निवडणुका घेतल्यास आयोग दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपनेही दुबार मतदारांचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवीन सुधारित मतदार यादी प्रसिद्ध झाल्याशिवाय निवडणुका घेणे अयोग्य ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे, तरच निवडणुका पारदर्शकपणे पार पडतील, असे खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जर पुरावे देऊनही निवडणूक आयोग निवडणुका घेत असेल, तर ते हेतुपुरस्सरपणे कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे असेच म्हणावे लागेल. विरोधी पक्षांकडून मतदार यादीत दुबार नावे आणि अनेक घोळ असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनीही दुबार मतदारांची काही नावे समोर आणली आहेत. असे असतानाही निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करणार असेल, तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे खडसे यांनी स्पष्ट केले

Published on: Nov 04, 2025 02:31 PM