नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यात सर्वसान्यांसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा फंड देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 50 नवी विमानतळ उभारणार असल्याचीही घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा होणार, त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च येणार आहे. 44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच देण्यात येईल, असंही त्यांनी सागंतिलं आहे. येत्या वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याची अपेक्षा असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय.