Latur | नातवंडांनी सांभाळ केला नाही; आज्जीने परत मिळवली कोट्यवधींची जमीन! व्हिडीओ होतेय व्हायरल
लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेला जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण दिलासा देत न्याय मिळवून दिल्याची घटना समोर आली आहे. नातवंडांकडून अपेक्षित सांभाळ आणि जबाबदारी पार पाडली जात नसल्याने संबंधित वृद्ध महिलेने आपल्या नावावरील जमीन आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली होती. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली आहे.
लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेला जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण दिलासा देत न्याय मिळवून दिल्याची घटना समोर आली आहे. नातवंडांकडून अपेक्षित सांभाळ आणि जबाबदारी पार पाडली जात नसल्याने संबंधित वृद्ध महिलेने आपल्या नावावरील जमीन आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली होती. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील कारसा येथील हौसाबाई लहाडे यांनी आपल्या नातवंडांच्या नावावर जमीन आणि मालमत्ता हस्तांतरित केली होती. मात्र, मालमत्ता हस्तांतरित केल्यानंतर त्यांचा योग्य सांभाळ केला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी संबंधित जमीन आणि मालमत्ता पुन्हा आपल्या नावावर मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती.
या प्रकरणाची सुनावणी आणि पडताळणी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने वृद्ध महिलेच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुसार, हौसाबाई लहाडे यांनी नातवंडांच्या नावावर केलेली जमीन आणि मालमत्ता पुन्हा त्यांच्या नावावर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वृद्ध महिलेला मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे कौतुकही केले जात आहे.
Published on: Jun 09, 2026 03:54 PM
नातवंडांनी सांभाळ केला नाही; आज्जीने परत मिळवली कोट्यवधींची जमीन!
एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ,
नाशिक विधान परिषद जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं? शिंदेंनी अचानक...
कल्याण-शीळफाट्यावर भीषण आग! टायर गोदाम जळतंय, धुराने काळवंडलं आकाश

