Laxman Hake : चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून OBC आरक्षण संपलंय? बहुजनांची जत्रा जेव्हा… हाकेंचा जरांगेंवर निशाणा
लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंवर टीका करत, एका चौथी नापास व्यक्तीच्या सांगण्यावरून ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांच्या सहीने हा निर्णय झाल्याचे ते म्हणाले. बहुजनांची जत्रा आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर भरेल, तेव्हाच त्यांना मोजले जाईल, असा इशाराही हाकेंनी दिला.
लक्ष्मण हाकेंनी जेजुरी दसरा मेळाव्यात बोलताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, एका चौथी नापास व्यक्तीच्या सांगण्यावरून आज ओबीसी आरक्षण संपुष्टात आले आहे. हाके यांनी दावा केला की, देवेंद्र फडणवीस यांच्या सहीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढे लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना उद्देशून म्हटले की, बहुजनांची जत्रा जोपर्यंत आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर एकत्र येणार नाही, तोपर्यंत त्यांना कोणीही मोजणार नाही. ज्या दिवशी ओबीसी समाज एकत्र येऊन आपली ताकद दाखवेल, त्या दिवशी जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. हाके म्हणाले की, जर ओबीसी समाजाला मोजले गेले, तर मनोज जरांगे यांचा गावचा एक सरपंचसुद्धा निवडून येणार नाही. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
'आमच डोकं खराब आम्हाला मोदीच पाहिजे', NDA बहुमतावर राणा काय म्हणाल्या?
बिहार निकालानंतर राऊतांच्या पहिल्या प्रतिक्रियेवर भाजपचं प्रत्युत्तर
शिंदे म्हणाले, बिहारच्या लाडक्या बहिणींनी दिली लँडस्लाईड व्हिक्ट्री..
सुळेंकडून नितीशबाबूंचं कौतुक! बिहार निकालावर राज्यात कोण-काय म्हणालं?

