मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांचा उपरोधिक टोला; म्हणाले, ‘कामं झाल्यावर बघा…मुंबई’
पहिल्याच पावसात मुंबई जेथे पाणी साचत नव्हते तेथेही पाणीच पाणी झाल्याचे पहायला मिळालं. यामुळे नागरिकांचे हाल झाले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी "पाऊस आल्याचे स्वागत करा. मुंबईत पाणी तुंबलय याची तक्रार काय करता" असा सवाल केला
मुंबई : राज्यात यंदा जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. मात्र या पहिल्याच पावसाने मुंबईच्या नालेसफाईचे चित्र स्पष्ट केले. पहिल्याच पावसात मुंबई जेथे पाणी साचत नव्हते तेथेही पाणीच पाणी झाल्याचे पहायला मिळालं. यामुळे नागरिकांचे हाल झाले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी “पाऊस आल्याचे स्वागत करा. मुंबईत पाणी तुंबलय याची तक्रार काय करता” असा सवाल केला. त्यावरून आथा जोरदार राजकारण रंगलं आहे. तर यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका करताना, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागल्याने शिंदे यांना लाज वाटली पाहिजे असं म्हटलं आहे. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील मुंबईत पाणी तुंबल्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांना उपरोधिक टोला लगावला आहे. त्यांनी, किती कामे सुरु आहेत, कामे सुरु असल्याने काही ठिकाणी पाणी साचलंय. कामं झाल्यावर बघा, मुंबई अजिबात तुंबणार नाही असा टोला लगावला आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

